प्रचंड उकाड्याने हैरान नागरिक विद्युत पुरवठ्याच्या लपंडावाने परेशान
पावसाळ्या पूर्वी विद्युत विभागाने दुरुस्ती व देखभालीचे कामाकडे लक्ष्य देण्याची मागणी
कारंजा : अवकाळी पावसाच्या वातावरणाने अचानक तापमानाचा पारा खाली आलेला असला तरीही आकाशातील ढगांच्या गर्दीमुळे भयंकर उकाडा वाढलेला असून,अंगाची लाही लाही होत आहे.याचा सर्वात जास्त त्रास व वेदना दुर्धर आजारग्रस्त, लहान मुले व वयोवृद्धांना होत असून प्रचंड अशा उकाड्या मुळे त्यांचा जीव कासावीस होत आहे. वास्तवात ए.सी. कुलरची हवाही भयंकर उकाड्यामुळे निष्काम ठरत आहे. त्यातच आणखी परेशान होण्याचे कारण म्हणजे ग्रामिण भागासह कारंजाच्या शहरी भागातही वारंवार रात्री दिवसा अचानक विजपुरवठा बंद होत असल्याने कारंजेकर परेशान झाले आहेत.त्यामुळे जवळ आलेले पावसाळ्याचे दिवस, वादळी वारे लक्षात घेऊन विद्युत विभागाने व्यवस्थित नियोजन करून,नादुरुस्त विद्युत रोहित्र (ट्रॉन्स्फॉर्मर) बदलविणे. तुटलेल्या व लोंबकळणाऱ्या विद्युत तारा बदलविणे अशी कामे तात्काळ करून घेऊन, कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीत विद्युत पुरवठा खंडीत होणारच नाही. याची दक्षता घेण्याची विनंती, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी विद्युत विभागाला केली आहे.
0 टिप्पण्या