Ticker

6/recent/ticker-posts

"नागरिक सजग – चोरट्यांना दम!" मुर्तीजापुर तालुक्यात लोकांची रात्रपाळी, पोलिसांना साथ – मुर्तीजापुर गावाचं उदाहरण ठरतंय प्रेरणादायी

"नागरिक सजग – चोरट्यांना दम!"
मुर्तीजापुर तालुक्यात लोकांची रात्रपाळी, पोलिसांना साथ – मुर्तीजापुर गावाचं उदाहरण ठरतंय प्रेरणादायी

 प्रतिनिधी- संतोष माने 
मुर्तीजापुर (ता. मूर्तीजापुर) – तालुक्यात गेल्या काही आठवड्यांपासून वाढलेल्या चोरीच्या घटनांनी नागरिक हैराण झाले असताना, आता लोकांनी स्वतः पुढे येत रात्रपाळी सुरू केली आहे. पोलीस प्रशासनाला या कृतीतून मोठा आधार मिळत असून, नागरिक आणि पोलिसांच्या एकत्र प्रयत्नांमुळे भुरट्या चोरट्यांची धास्ती वाढली आहे. विशेषतः तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरिकांनी संगठितपणे मोहिम हाती घेत रात्रभर गस्त घालणे सुरू केले आहे. या गस्तीदरम्यान काही गावकऱ्यांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग केला, त्यापैकी काहीजण पळून गेले, तर काही संशयितांना नागरिकांनी अडवून थेट पोलिसांच्या ताब्यात दिले. या सर्व घटनांवर पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत सखोल चौकशी सुरू केली आहे.


या प्रकारामुळे गावात मोठा संदेश गेला असून, नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. सतर्कतेमुळे अनेक गावांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे, हे स्पष्टपणे जाणवते.

पोलिसांचे म्हणणे – “नागरिकांचा सहभाग मोलाचा”

मूर्तीजापुर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित जाधव म्हणाले, “पोलीस दलात मर्यादित कर्मचारी असल्यानं प्रत्येक गल्लीत पोहोचणं तात्काळ शक्य होत नाही. मात्र नागरिक जर सहकार्य करत असतील, तर गुन्हेगारीला आळा घालणं निश्चित सोपं होतं. नागरिकांनी संशयित दिसल्यास आम्हाला तात्काळ माहिती द्यावी, पण कोणतीही हिंसक कृती टाळावी.”




नागरिकांचं मत – "आम्ही झोपणार नाही, गावाला शांत झोप हवी!"

अनभोरा रहिवासी उमेश ढाकरे सांगतात, “दर रात्री चार-चार जणांची टिम करून आम्ही गस्त घालतो. पोलीस आमच्या संपर्कात असतात. हे आमचं गाव आहे, याची जबाबदारी आमचीसुद्धा आहे.” तर, एका महिलांनी सांगितलं, “आधी रात्री घाबरून झोपायचो, आता वाटतं की आपणच काहीतरी करू शकतो.”

सावध राहा, सजग राहा – कायदा हातात घेऊ नका

प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने आवाहन केलं जात आहे की, कोणीही संशयित व्यक्ती सापडल्यास त्याला मारहाण करू नये. काही वेळा वादातून निष्पाप व्यक्तींना त्रास होतो, त्यामुळे कायदा हातात न घेता पोलिसांना वेळेवर माहिती देणं हेच जबाबदार नागरिकत्व आहे. मुर्तीजापुरातील ही चळवळ पोलिस आणि नागरिकांच्या एकत्र कृतीचा आदर्श नमुना ठरत आहे. इतर गावांनीही याचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सतर्क नागरिकच सुरक्षित समाजाची पहिली पायरी आहेत.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या