रखरखत्या उन्हात पार पडली जयाजी महाराजांची यात्रा उत्साहात
प्रतिनिधी नागोराव तायडे
हिरपूर येथे संत जयाजी महाराज यात्रोत्सव नऊ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गाडपगार हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे रखरखत्या उन्हातही भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. सकाळी सात ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत नवस बोललेल्या 21 भक्तांनी गच्च भरलेल्या पाच बैलगाड्या एकाच वेळी बोलल्या हा गाडपगार उत्सव पाहण्यासाठी भाविकांनी तापत्या उन्हाची तमा न बाळगता उपस्थिती लावली. हिरपुर व पंचक्रोशीतील संत जयाजी महाराज जागृत देवस्थान आहे. उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे लोक घराबाहेर पडणे पसंत करत नाही. परंतु जयाजी महाराजांच्या श्रद्धेपोटी भर उन्हातही दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केली होती. आख्यायिकेनुसार देवस्थानाला चारशे वर्ष इतिहासाची किनार असून गाडपगार व मंडईची प्राचीन परंपरा आहे. ही परंपरा आजही जोपासल्या जाते. सात दिवस फक्त एक वेळ दूध ठेवून उपवास केलेल्या भक्ताला हळद लावून काळी घोंगडी टाकून, पूर्ण गावांतील वेगवेगळ्या मंदिरात रखरखत्या रस्त्याने अनवाणी पायाने वाजत गाजत मंदिरामध्ये आणले जाते. त्यानंतर राजगुरे यांच्या वाडीमध्ये असणाऱ्या सतीच्या मंदिरामध्ये दर्शना करता गाडी ओढणाऱ्या भक्ताला नेऊन या ठिकाणी पूर्ण ताकदीने कमर बांधून आकोडा लावल्या जातो. त्यानंतर गाड्याला पाच फेऱ्या मारल्यानंतर भरगच्च भरलेल्या गाड्या एकटा भक्त ओढतो. हा उत्सव पाहण्यासाठी गावातील सर्व मुली माहेरी येतात. दरवर्षी जागृत देवस्थानची महिमा वाढत असताना खूप दूरून भक्त या ठिकाणी येत आहे.
सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे
सिंहासनावर आरतीची सेवाधारी देणारे बाळासाहेब चौधरी, अक्षय गावंडे, प्रतीक चौधरी, प्रफुल चौधरी, मोहन डाबेराव, रामभाऊ कोराट, तर गाडपगार यशस्वीरित्या पार पाडण्याकरता दिनेश अवलक,सुमेर यादव, किरण चारथळ , गौरव उंबरकर, विनोद तिहीले, अनिल डांगे, कोमल बंडाळे, गणेश गवळी, दिनेश दहिकर, संतोष धांडे,शिवराम तिहिले, दत्ता उंबरकर,संदिप हेमणे, योगीराज डाहाके, शंतनू भालेराव,बाळू महाराज मेटांगे ,गोपाळराव गणोरकर तसेच मंदिर अध्यक्ष आनंदराव गणोरकर व संजय राऊत,सुदामा तायडे,सदस्य यांनी परिश्रम घेतले.ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार श्रीधर गुट्टे व बिट जमादार खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्तात यात्रा शांततेत पार पडली.उन्हामुळे जीवाची लाही नाही होत असताना ब्रह्माकुमारी परिवाराद्वारे भाविक भक्तांताना थंडगार पन्हं देऊन तूष्णा तृप्ती करण्याची सेवा करण्यात आली.
0 टिप्पण्या