पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये रौंदळा प्रथम क्रमांकाचे मानकरी, आमिर खान व कृषी मंत्र्यांच्या हस्ते सन्मानित
प्रतिनिधी - चोहोट्टा बाजार पूर्णाजी खोडके
चोहोट्टा बाजार: पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धचे बालेवाडी पुणे येथे २३ मार्च बक्षीस वितरण करण्यात आले.मध्ये आकोट तालुक्यातील लक्ष्मीमाता शेतकरी उत्पादक गट अडगाव खुर्द या गटाने राज्यातील मुख्य 25 गटांमध्ये स्थान मिळवले, तसेच स्वामी विवेकानंद शेतकरी उत्पादक गट रौंदळा यांनी तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. समता महिला शेतकरी उत्पादक गट पिलकवाडी व जय हनुमान महिला शेतकरी उत्पादक गट पळसोद हे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले,तसेच गोमाता महिला शेतकरी उत्पादक गट धामणा बुद्रुक व समृद्धी महिला शेतकरी उत्पादक गट आसेगाव बाजार यांना देखील उत्कृष्ट कामगिरी करिता पानी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2024 पारितोषिक वितरण समारंभ पुणे येथे सन्मानित करण्यात आले.गट शेतीवर आधारित पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये या गटांनी सहभाग नोंदवला होता, ज्ञान विज्ञानाच्या जोडीने गट शेतीची कास धरत, या गटांनी सुधारित शेती पद्धतीचा वापर करून उत्तम शेती केली, भरघोस उत्पादन मिळवले. स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केली. ही स्पर्धा महाराष्ट्रातील ४६ तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेत अकोट तालुक्यातून 100 तर संपूर्ण राज्यात चार हजारांहून अधिक गट या स्पर्धेमध्ये सहभागी होते, या गटांपैकी उत्तम कामगिरी करून लक्ष्मीमाता शेतकरी उत्पादक गट अडगाव खुर्द यांनी महाराष्ट्रात मुख्य 25 गटांमध्ये स्थान मिळवले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.देवेंद्र फडणवीस यांनी या गटाला पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले,स्वामी विवेकानंद शेतकरी उत्पादक गट प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला, त्यांना पन्नास हजार रुपये व सन्मान चिन्ह देऊन पानी फाउंडेशनचे संस्थापक अमीर खान,किरण राव, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री .माणिकराव कोकाटे, पानी फाउंडेशनचे सीईओ .सत्यजीत भटकळ, पानी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ, सिने अभिनेते गिरीश कुलकर्णी व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, तसेच समता महिला शेतकरी उत्पादक गट पिलकवाडी व जय हनुमान महिला शेतकरी उत्पादक गट पळसोद हे गट द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले यांना प्रत्येकी पंचवीस हजार व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
पानी फाउंडेशन आयोजित या पारितोषिक वितरण सोहळ्याला पानी फाउंडेशन चे संस्थापक अमीर खान, किरण राव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री.माणिकराव कोकाटे, पद्मश्री पोपटरावजी पवार, सह्याद्री फॉर्म्सचे संचालक .विलास शिंदे, पानी फाउंडेशन चे सीईओ सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, शास्त्रज्ञ, महाराष्ट्रातील विविध अधिकारी, विविध संस्थांचे प्रमुख, सीने अभिनेते व पानी फाउंडेशन टीमचे विभागीय समन्वयक उज्वल बोलवार, तालुका समन्वयक जीवन गावंडे, प्रशिक्षक हितेश सरप व पूर्ण पानी फाउंडेशन टीम उपस्थित होती.
या गटांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तालुक्यातील विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे, या गटांनी आपल्या यशाचे श्रेय पाणी फाउंडेशन व उमेद अभियान यांना देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
0 टिप्पण्या