करोडी येथे..ग्रामीण जीवन ज्योती अभियान महिला बचत गटांच्या गावांमध्ये रॅली
अकोट तालुका प्रतिनिधी पुर्णाजी खोडके
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान स्वतंत्र व कायमस्वरूपी करणाऱ्या करिता गावामधून रॅली काढण्यात आली 2026 मध्ये हे अभियान बंद होणार असा जीआर आलेला आहे.. या अभियानामध्ये 84 लक्ष महिला कुटुंब बचत गटामार्फत जोडलेले आहेत.. आणि अभियानाच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक सामाजिक विकास होऊन प्रत्येक महिलाही सक्षम झालेली आहे.. हे अभियान कायमस्वरूपी स्वातंत्र्य व्हाव याकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाव पातळीवर वरील सर्व कॅडर कर्मचारी आंदोलन करीत आहे.. या रॅलीमध्ये करोडी गावांमध्ये गाव पातळीवरील कार्यरत ग्रामसंघ अध्यक्ष,सिमा धुमाळे, बँक सखी रंजना वालुलकर ळCRP शिसा ठोपकर, दुर्गा फाळके पुष्पा गव्हाळ लीपीका ज्योती नेरकर, व सर्व पदाधिकारी कॅडर कर्मचारी उपस्थित होते व त्यांनी महत्त्वाचीभुमीका बजावली आहे.



0 टिप्पण्या