वृक्ष लागवडीत घोळ : चौकशीकडे दुर्लक्ष
पातुर तालुक्यातील प्रकार : शिवसंग्रामची पुन्हा तक्रार
प्रतिनिधी नासीर शेख
पातूर : पातुर तालुक्यात नरेगांतर्गत अनेक वर्षापासून वृक्ष लागवडीची मोहीम सुरू आहे. वृक्ष लागवडीच्या संगोपनावर कोट्यावधी रुपयांचे देयक काढण्याचा सपाटा पातुर तालुक्यात सुरू आहे. मात्र वृक्ष लागवडीची वाढ तीन ते पाच फुटापर्यंतच आहे. संबंधितांकडून वृक्ष संगोपनाचे देयक काढण्यासाठी हजारो रुपयांची वसुली केली जात असल्याने शासनाच्या डोळ्यात माती टाकून शासनाला कोट्यावधी रुपयांचा गंडा लावण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप शिवसंग्रामचे जिल्हा अध्यक्ष दिलीप परनाटे यांनी अमरावतीचे विभागीय आयुक्त व अकोल्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार केलेल्या तक्रारीतून केला आहे. परंतु दोन महिने उलटूनही संबंधितांकडून चौकशी करण्यात आली नसल्याने शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष पुन्हा आक्रमक झाले असून, २४ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकाऱ्याकडे पुन्हा तक्रार केली आहे. चौकशी केली जाते की वृक्ष लागवडीत घोळ करणाऱ्यांना अभय दिला जाते, याकडे पातुर तालुका वासीयांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या