Ticker

6/recent/ticker-posts

केंद्र सरकारचा बळीराजाला दिलासा, कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबियाला मिळाला योग्य भाव

केंद्र सरकारचा बळीराजाला दिलासा, कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबियाला मिळाला योग्य भाव


अकोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना व देशाच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने क्रांतिकारी निर्णय घेऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल व शेतकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधान पर्यंत पोहोचून नामदार देवेंद्र फडणवीस ज्यांनी इतिहासिक निर्णय यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर आभार समस्त विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तील चार कोटी शेतकऱ्यांच्या वतीने भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्र सरकारने आमच्या बळीराजासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मी त्यांचा अतिशय मनापासून आभारी आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने हे निर्णय निश्चितपणे क्रांतीकारी ठरतील आणि त्यामुळे आमच्या कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल. असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त करून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून नामदार देवेंद्र फडणवीस यांनी कुशल नेतृत्व असल्याचे व शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार असल्याचे कृतीने सिद्ध केले आहे.


खाद्यतेलाच्या आयातीवर आधी कोणतेच शुल्क नव्हते, त्यावर आता 20 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना अधिक किंमत मिळेल. याशिवाय रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेलावर कस्टम शुल्क 12.50% वरून 32.50% करण्यात आले आहे. सोयाबीन खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने आधीच घेतलेला आहे. त्यामुळे बळीराजाला फार मोठा आधार व शेतमालाला चांगले भाव मिळणार आहे.


 कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरुन 20 टक्के इतके कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय कांद्याची निर्यात करताना किमान निर्यात किंमत (एमईपी) ही पूर्णपणे संपविली आहे. यातून कांदा उत्पादकांना चांगला भाव मिळेल उत्तर महाराष्ट्र तसेच अकोला जिल्ह्यातील पातुर अकोट तेल्हारा अकोला तालुका तसेच बार्शीटाकळी मुर्तीजापुर तालुक्यातील. शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.


 बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी सुद्धा किमान निर्यात किंमत (एमईपी) ही पूर्णपणे मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे यासाठी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या हितासाठी व शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजना मागील तिथे शेततळा तसेच साहित्य वेगवेगळ्या योजना सुरू करून गेल्याच सत्तर वर्षाच्या कालखंडात काँग्रेसने केवळ गप्पांचा बाजार केला विशिष्ट लोकांचा कल्याण केलं परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकार हे सर्वांचे कल्याण करणारे सरकार आहे हे सातत्याने कृतीने सिद्ध करत असतात आणि लाडकी बहीण योजनेसोबत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक विमा नुकसान भरपाई देण्यात दिल्यानंतर आता ज्या पद्धतीने केंद्र सरकारने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे तसेच महाराष्ट्र सरकारने ओला दुष्काळ घोषित करून पूर्णपणे सरकार शेतकऱ्यांना दिलासा घ्यावा अशीही अपेक्षा व्यक्त करून विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त करून शेतकऱ्यांच्या समस्येसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून योजना मंजूर करून दिलासा देण्याचे काम देवेंद्र फडणवीस देवा भाऊंनी केल्याबद्दल तमाम अकोला जिल्ह्याच्या वतीने सुद्धा भारतीय जनता पक्ष अकोला जिल्ह्याने देवेंद्र फडणवीस यांचे आभार व अभिनंदन केले आहे खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल किशोर पाटील जयंत मसने बळीराम शिरस्कार तेजराव थोरात श्रीकृष्ण मोरखडे प्रभाकर मानकर, राजेश बेले शंकराव वाकोडे उमेश पवार डॉक्टर अमित कावरे गजानन उंबरकर, डॉक्टर राम तिडके सुलभात दुतोंडे सुमन ताई गावंडे कुसुमताई भगत वैशाली निकम गीतांजली ताई शेगोकार वैशाली शेळके स्मिताताई राजनकर गजानन नळकांडे केशवराव ताथोड हिरासिंग राठोड अशोक राठोडयांनी सुद्धा सरकारची अभिनंदन आभार व्यक्त केले आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या