दु:खद! 21 वर्षीय युवतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
मूर्तिजापूर
प्रतिनिधी- संतोष माने
21 वर्षीय युवतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुर्तीजापुर तालुक्यात उघडकीस आली आहे. कामावरून घरी परत आल्यानंतर तुझ्या आईसोबत थोडी बोलचाल झाली असता घरून निघून गेली. आई व मामा यांनी तिचा शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. आज 17 जानेवारी सकाळच्या दरम्यान गावातील एका शेतात एका व्यक्तीचे प्रेत विहिरीत तरंगताना आढळल्यामुळे खळबळ उडाली. घटनास्थळी मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस दाखल होऊन गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
सतीश नामदेव भगत वय ५२ वर्ष धंदा मंजुरी रा. साजापुर ता. मुतीजापुर जि. अकोला यांच्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशन मुर्तीजापूर ग्रामीण भागात कुंटुबासह राहतात. सदर कुटुंब मंजुरीचे काम आपला उदरनिर्वाह करीत आहेत. तक्रारदार यांची बहीण कांचन विनोद अरदे ही मुतीजापुर बैंक कॉलनी येथे कुंटुबासह भांडयाने राहते तिला एक मुलगा नामे आदर्श व दोन मुली असुन मोठी वैष्णवी व लहानी नम्रता असे राहतात मोठ्या मुलीचे लग्न झाले असुन ती सासरी राहते व लहान मुलगी जनाता ही मातृसेवा हास्पीटल येथे काम करते.
दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्याण फोन वर मनोज ढगे यांनी माहीती दिली की, आपल्या हिरपुर सिरसो रोडवरील शेताजवळ तुझ्या भाचीची स्कुटी गाडी उभी आहे. व शेतातील विहीरीचे काठावर एक बॅग ठेवली आहे. तरी तु इतपर्यंत येवुन पाहा अशा माहीतीवरून मनोज ढगे व गावातील संजय राउत, रवि शिंदे, अतुल यादव व इतर बरेच लोक जमलेली होती. मनोज ढगे याचे शेतातील विहीरीमध्ये बॅटरीचे उजेडात पाहीले असता विहीरीचे पाण्यात एक प्रेत तंरगत होते, कपड्यावरुन व तिचे पायातील बुटावरुन आपली भाची नामे नम्रता विनोद गरदे वय अंदाजे २१ वर्ष रा. मुतीजापुर ही असल्याचे खात्री झाली. त्यानंतर नागरीकांच्या सहकार्याने पोलीसांनी प्रेत विहीरीचे बाहेर काढले. विहीरीजवळ ठेवलेल्या बॅग मधील आयकार्ड वरून नम्रता गरदे असल्याची खात्री पटली. १६ जानेवारी २०२५ रोजी नेहमी प्रमाणे सकाळी ९ वाजता कामावर गेली होती ती नेहमी रात्री ८ वाजता घरी येते, परंतु ती घरी आली नाही म्हणुन तिचे आईने हास्पीटलमध्ये फोन करन विचारले असता ती ७.४५ वाजताच घरी गेल्याचे समजले. त्यानंतर आपल्या बहीणीने शोधाशोध केली व आपल्याला सुध्दा फोन केला की नम्रता तुझ्याकडे हिरपुरला आली का? ती आपल्याकडे आली नसल्याचे सांगीतले. विचारपुस केली असता बहीणीने सांगीतले की, तिला थोडी बोलली होती व ती आतापर्यंत घरी आली नाही असे आपली बहीण कांचन गरदे हिने सांगीतले. नम्रता हिने मनोज ढगे याच्या शेतातील विहीरीमध्ये पाण्यात बुडुन मरण पावली असल्याचे सांगून आपला संशय नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
0 टिप्पण्या