Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी, भाजपा प्रदेश प्रवक्ता आशिष चांद राणा व आमदार सावरकर

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदीभाजपा प्रदेश प्रवक्ता आशिष चांद राणा व आमदार सावरकर


अकोला
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला नसून अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्यातल्या वाढवण बंदरासाठी 76 हजार कोटींची तरतूद करण्यात आली. अकोला खंडवा रेल्वेसाठी तरतूद करण्यात आली आहे वर्धा यवतमाळ रेल्वे साठी सुद्धा तरतूद करण्यात आली आहे . रेल्वे खात्यासाठीच्या तरतुदीत महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी 15 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पाच्या रूपाने वाटचाल सुरु झाली आहे,असे प्रतिपादन भाजपा प्रदेश प्रवक्ता आशिष चांद राणा व भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.


 यावेळी जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकडे आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल जयंत मसणे , माधव मानकर अशोक गुप्ता विजय पण पालिया, सिद्धार्थ शर्मा गिरीश जोशी, वसंत बाचोका निकेश गुप्ता हरीश आलम चंदानी, विनोद मनवानी, एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर डॉक्टर अभय जैन , डॉक्टर किशोर मालोकार,ं डॉक्टर राजेश देशपांडे श्रद्धा शर्मा कृष्णा शर्मा पंकज मणियार कुंजबिहारी जाजू आदी यावेळी उपस्थित होते. 
श्री . आमदार सावरकर, आशिष चांद राणा, यांनी सांगितले की, देशभरात 12 इंडस्ट्रियल पार्क उभारले जाणार आहेत त्यात राज्यातील दिघी येथे उभ्या राहणाऱ्या इंडस्ट्रिअल पार्कचाही समावेश आहे . पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी 11 लाख कोटी एवढी विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. याचाही फायदा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी देऊन महाराष्ट्राला न्याय दिला आहे व महाराष्ट्राच्या विकासामध्ये व पायाभूत योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.


2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकारण्याचा निर्धार या अर्थसंकल्पातून प्रतीत होतो आहे असे सांगत आमदार सावरकर आशिष चांद राणा, यांनी या अर्थसंकल्पातील तरतुदींकडे लक्ष वेधले. भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प असल्याने उद्योग क्षेत्रातून या अर्थसंकल्पाचे मोठे स्वागत करण्यात आले आहे. आणखी तीन वर्षांत भारताला जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पाच्या रूपाने पाऊल टाकले आहे. शेती क्षेत्रासाठी 1 लाख 52 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असेही सावरकर यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत बाचोका तर संचालन निकेश गुप्ता तर आभार प्रदर्शन विजय पनपालीया यांनी केले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या