Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजरत्न आंबेडकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उतरणार विधानसभा निवडणूक मैदानात

राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजरत्न आंबेडकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उतरणार विधानसभा निवडणूक मैदानात 



राखीव जागावर करणार उमेदवार उभे, अकोला जिल्ह्या कार्यकारिणी केली घोषित 


अकोला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २० जुलै १९२४ रोजी बहिस्कृत भारत हे वृत्तपत्र चालवायला प्रारंभ केला होते. त्याचा २० जुलै रोजी शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. यांचवेळी बौध्द समाजाची राजकीयस्थिती आणि दिशा याबाबत डॉ राजरत्न आंबेडकर यांनी विचार मांडत असताना गेल्या ४० वर्षात बौध्द समाजाचा एकही प्रतिनिधी बौध्द हीतासाठी राजकीय सभागृहात पोहचला नाही. हे वास्तव मांडत असताना सध्या दिशाहीन झालेल्या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आणि बौध्द समाजाचे प्रश्न राजकीय सभागृहात मांडण्यासाठी योग्य त्या मार्गांचा अवलंब करून वेळप्रसंगी राज्यातील सत्तेत राहिलेल्या पक्षसोबत युती करून आरक्षित जागावर लढून मोठया प्रमाणात प्रतिनिधी पाठवण्याची अतिआवश्यकता असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजरत्न आंबेडकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश हनुमंतेयांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत सांगितले.

  ३० सप्टेंबर १९५६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन बरखास्त केली होती. त्यानंतर बौध्द समाज आणि इतर मागासवर्गीय समाजाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाची संकल्पना खुल्या पत्रद्वारे समाजापुढे मांडली. मात्र त्या खुल्या पत्राच्या आधारे संकल्पनातील रि.पा.ई. अस्तित्वात आलाच नाही म्हणून डॉ. राजरत्न आंबेडकर यांची या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२४ ही तारीख निवडलेली होती. मात्र त्यापूर्वीच महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची घोषणा होण्याची शक्यता असल्यामुळे आज ९ ऑगस्ट रोजी रिपब्लिकन पार्टीची अकोला जिल्हा व महानगर कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली असून अकोला जिल्ह्यातील कार्यकारिणीची घोषणा करताना
डॉ. अरुण चक्रनारायण, एम एम तायडे, बाळासाहेब अंभोरे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्षपदी देवीलाल तायडे तर महानगर अध्यक्षपदी सुनील सिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिह्वा महासचिव दिवाकर गवई, उपाध्यक्ष प्रमोद तेलगोटे, सचिव यशवंत इंगोले, जितेंद्र अहीर, सदस्य नंद रत्न खंडारे, राजेश समदुरे तर महानगर अध्यक्ष सुनील सिरसाट, महासचिव प्रा. राहुल इंगळे, उपाध्यक्ष साहेबराव इंगळे,,युवक आघाडी अध्यक्ष उमेश इंगळे, आणि रिसोड विधानसभा अध्यक्ष अजाबरावं सदार यांच्या नियुक्ती ची घोषणा करण्यात आली आहे असेही त्यांनी जाहीर केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऍड.चंद्रशील दंदी, भीमराव तायडे, आनंदा पळसपगार, प्रदीप धांडे, हिम्मत राव सदाशिव, मधुकर सिरसाट, दयाराम तायडे,संजय इंगळे, सह अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर तालुक्यातील सदस्य उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या