Ticker

6/recent/ticker-posts

शिवभक्तांना कोणतेही त्रास होता कामा नये- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिवभक्तांना कोणतेही त्रास होता कामा नये- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील



अकोला 
शिवभक्तांना कोणतेही त्रास होता कामा नये अशा सूचना प्रशासनाला जिल्हाचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.  खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारताकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील जयंत मसने विजय अग्रवाल व शिवभक्तांनी शिवभक्तांना होणाऱ्या त्रासा संदर्भात प्रशासनांनी योग्य ती दखल घ्यावी अशा सूचना व निवेदन दिले होते. 



सध्या काम धीमिगतीने सुरू असून याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर खासदार धोत्रे यांच्या निवेदनाची दखल पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेऊन जिल्हा प्रशासनाला प्रत्यक्ष जाऊन शिवभक्तांना गांधीग्राम तसेच काटेपूर्णा परिसर व वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहे. 


अकोट या भागातील शिवभक्त पूर्णामाता जल घेण्यासाठी येतात तिथे घाट नसल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तिथे टाके व पर्यायी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना केल्या होत्या तसेच पायऱ्या करण्यात आल्या परंतु शिवभक्तांना पहिल्या सोमवारी झालेली अडचण लक्षात घेता त्या पायऱ्यांमध्ये विस्तार करून कमानी लावण्याच्या सूचना तसेच रस्त्याची विस्तार व कचऱ्याचे ढीग लागणार नाही याची सूचना देण्यात आल्या होत्या या संदर्भात प्रशासन आणि दखल घेतली असून शिवभक्ताच्या भावनेची कदर लोकप्रतिनिधीच्या सूचनेनंतर झाली असून शिवभक्तांना कोणताही त्रास होणार नाही तसेच जिल्ह्याची ठिकाणी कावड यात्रा कोणत्या नदीवर जाते याचा प्रश्न प्रशासनाने लक्ष घेऊन तिथे सुविधा पुरवाव्या अशा सूचना खासदार अनुप धोत्रे यांनी केले आहे. 
आमदार रणधीर सावरकर यांनी सर्वप्रथम शिवभक्तांच्या सोबत जाऊन रस्त्याची पाहणी करून अडीअडचणी दूर करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या त्याची अंमलबजावणी झाली परंतु शिवभक्तांचे अनु आणि पहिल्या शिवभक्ताची अनुभव लक्षात घेता त्यामध्ये विस्तार करण्याच्या सूचना देण्यात आले आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या