Ticker

6/recent/ticker-posts

मूर्तिजापूरच्या भारतीय ज्ञानपीठ विद्यालयाचा १९९२-९३ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात

मूर्तिजापूरच्या भारतीय ज्ञानपीठ विद्यालयाचा १९९२-९३ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात


32 वर्षांनंतर मैत्रीचा गोतावळा; शालेय जीवनातील आठवणींना उजाळा "लहानपण देगा देवा विसर न व्हावा " या म्हणीचा आणला प्रत्यय 


मूर्तिजापूर - मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय ज्ञानपीठ विद्यालय, मुर्तीजापुर येथील सन 1992 -93 मधील दहावीचे विद्यार्थी तब्बल 32 वर्षानंतर एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान सहभागी मित्रांनी आपली कला सादर केली तसेच मनोगत व्यक्त केले.. मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर 32 वर्षानंतर एकत्र येऊन मैत्रीचा गोतावळा निर्माण झाला.

 

        शहरातील भारतीय ज्ञानपीठ विद्यालय मूर्तिजापूर येथील १० वीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन समारंभानिमित्त सर्वजण सालासर रिसोर्ट येथे एकत्रीत झाले . शाळा हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. आयुष्यात शाळा व शिक्षक ही खूप महत्त्वाची भूमिका असते . शाळा सोडल्यानंतरही शाळा, शाळेतील शिक्षक आणि त्यांच्या आठवणी या आयुष्यभर आठवणीत असतात. काही जण स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून या आठवणी जिवंत ठेवतात .
 " ए तुझ्यात किती बदल झालाय, अय्या तू ओळखूच येत नाही, तू किती बदलली / बदलला " अशा संवादाने शहरासह ग्रामीण भागातील सवंगड्यांचा तब्बल ३२ वर्षांनंतर गोतावळा जमला. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येऊन एकमेकांना भेटतांना आपुलकीने विचारपूस करत मनसोक्त गप्पा रंगल्या.  


यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना शुभेच्छा देतांना हा ३२ वर्षानंतर वर्ग मित्रांसोबत एकत्र येण्याचा योग ज्यांनी घडवून आणला त्यांचे सुद्धा कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून स्वतःची ओळख करून देताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांनी शाब्बासकी, तासाच्या वेळी केलेली शिक्षा, कौतुकाने दिलेली - गंमतीजमती सांगताना किती बोलू किती नाही अशी स्थिती सर्वांची झाली होती.कार्यक्रमास उशिरा आलेल्या वर्ग मित्रांना कान पकडून उडबशा करायला लावल्याने शाळेची अनुभूती प्रत्ययास मिळाली.शेवटी स्नेहभोजनाचा आस्वाद घेवून कार्यक्रमाची सांगता झाली.
        याप्रसंगी भूषण भडांगे, अशोक राजपाल, डॉ.गोपी सोरडे, महेश काळबांडे, सुनिल लछुवाणी,संतोष माने, सुनील वानखडे, प्रकाश मोरे, कमल कुर्मी,किर्तीकुमार भारुका, अमर चव्हाण,अतुल खंडारे, मनोज बोर्डे, प्रशांत गवारे, राहुल मुळे, राजेश ठाकरे, राजेश नाकट, प्रशांत बरडे, सुषमा कडू,डॉ.करुणा जगताप, वैशाली सपकाळ,प्रिती ठाकरे, जयश्री महल्ले,प्रिती अग्रवाल,अंजली खंडारे, रेखा अग्रवाल, भाग्यश्री वानखडे इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या