राधाकृष्ण विखे जिल्ह्याच्या इतीहासातील सर्वात अपयशी व निष्क्रीय पालकमंत्री
पालकमंत्री हरवले आहेत असे कंम्पेन राबवणार, जिल्ह्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या पालकमंत्री विखेंनी राजीनामा द्यावा, प्रदेश कांग्रेस चे प्रवक्ते कपिल डोके ह्यांची पत्रकार परीषद
अकोला जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आतापर्यंतचे सर्वात निष्क्रीय व अपयशी पालकमंत्री ठरले आहेत. पालकमंत्री अकोला जिल्ह्याकडे करत असलेले दुर्लक्ष पाहता पुढील दिवसामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हरवले आहेत अशा पद्धतीचे कैम्पेन बाम्ही हाती घेणार आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल डोके ह्यांनी केले. स्थानिक शासकीय विश्रामगृह अकोला येथे आयोजीत पत्रकार परीषदेमध्ये ते बोलत होते.
ह्या पत्रकार परिषदे दरम्यान पुढे बोलताना ढोके ह्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्यांच्या अपयशी कारभाराचा पाढाच वाचला, पालकमंत्र्याचा जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय बाचीवरती अंकुश असायला पाहीजे परंतु हे सध्याचे पालकमंत्री गत फेब्रुवारी महीन्यापासुन जिल्ह्यात फिरकलेच नाहीत. ह्यांनी कधी अवकाळी पाऊसामुळे नुकसानग्रस्त मागाला भेटी देऊन पाहणी करण्याचे साधे सीजन्य सुद्धा दाखवले नाही तर अनेक प्रशासकीय कामे जिल्ह्यामध्ये प्रलपीत आहेत ह्याचा आढावा सुद्धा पालकमंत्री विखे ह्यानी बेतलेला नाही. अत्यंत महत्वाच्या खरीपाच्या नियोजन बैठकीला सुद्धा बिले पाटील उपस्थीत नव्हते तर जिल्ह्या मध्ये मोठ्या प्रमाणात बिवाणे व खताचा तुटवडा असताना पालकमंत्री शेतक
अनेक बँकामध्ये पिककर्जा साठी शेतकरी चकरा मारत आहेत बँका पिक कर्ज देतांना शेतक-यांची अडवणूक करंत आहेत अशा वेळी पालकमंत्र्यानी लक्ष देणे गरजेचे असतांना पालकमंत्री जिल्ह्याकडे ढुंकुणही पाहत नाहीत ही गोष्ट शेतक-यासाठी आसदायक आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे २६ फेब्रुवारीच्या रात्री गारपिटीसह झालेल्या अवकाळी ने चार तालुक्यातील १ हजार १५२ हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी २१ कोटी १० लाख ३१ हजार ४८२ रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने २२ मार्च रोजी शासनाला सादर केला. तर एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ११ हजार ८४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले. या करिता ३२ कोटी ९५ लाख ९६ हजार ३८ रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव १४ मे रोजी शासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे ५४ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे. पेरणी संपत आली तरी ही शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही आणी पालकमंत्री विखे
ही मदत शेतकऱ्यांना मिळवून देण्यातही अपयशी ठरले आहेत. ह्यासह जिल्ह्यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी हे महत्वाचे पद में २०२३ पासुन रिक्त आहे. तर जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद ४ महीन्यांपासुन रिक्त आहे. ह्या कडे लक्ष द्यायला सुद्धा पालकमंत्री विखे पाटील ह्याना अद्याप वेळ मिळाला नाही. डिपीसी वर अजुनही कार्यकाळ संपत आला तरीही जिल्हा परीषदेमधील ओबीसी सदस्य नियुक्त केलेले नाहीत. जिल्ह्यामध्ये पानंद रस्ते शेतकऱ्याऱ्यांच्या मानणी नुसार न झाल्यामुळे यदा शेतकयांचे प्रचंड हाल होणार आहेत. शेत मोजणीचे हजारो प्रकरणे
भुमी अभिलेख विभागाकडे प्रलंबीत आहेत त्यावर सुद्धा कुणाचे नियंत्रण नाही
अश्या प्रकारच्या अनेक समस्या ह्या जिल्ह्यासमोर आहेत. आणी अशा परीस्थीतीत पालकमंत्र्यांनी प्रशासनावर अंकुश ठेवणे आवश्यक असतांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्यांना जिल्ह्याकडे पहायला सुद्धा वेळ नाही म्हणजे पालकमंत्र्यानीच जिल्ह्याला अनाथ केले अशी परिस्थीती आहे. त्यामुळे पालकमंत्री विखे पाटील ह्यानी राजिनामा द्यायला पाहीजे अशी मागणी सुद्धा ह्यावेळी कपिल डोके ह्यांनी केली,
0 टिप्पण्या