काल पुरात रस्ता गेला वाहून, अनं आज युद्ध पातळीवर कामासाठी अधिकारी आले धावून
दनोरी - पनोरी येथे काल आलेल्या पूरात रस्ता वाहून गेला.. अन् आज युद्धपातळीवर काम करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आमदार रणधीर सावरकर यांच्या कार्याला गावकऱ्यांनी सलाम दिला आहे.
अकोट तालुक्यातील दनोर - पनोरी येथील नवीन पुलाचे काम सुरू असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तेथील ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध दिला होता. परंतु काल पठार नदीला आलेल्या पुरामुळे सदर पर्यायी मार्ग वाहून गेल्याने या गावचा संपर्क तुटला होता. या घटनेचि महिती अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांना मिळताच त्यांनी या बाबीची दखल घेवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची तात्काळ बैठक बोलवून नागरिकांची हि समस्या एका दिवसात सोडवून त्यांना दिलासा द्यावा असे आदेश दिले. आमदार साहेबांच्या आदेशानंतर लगेच सबंधित अधिकाऱ्यांनी भर पावसात या रस्त्याच्या कामाला गती देण्याची कारवाई केली. आमदार सावरकर यांनी याआधी सुद्धा अनेक वेळा जनहितासाठी तत्परता दाखवून नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देवून त्या सोडवल्या आहे. याबद्दल सर्व नागरिकांकडून त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
0 टिप्पण्या