Ticker

6/recent/ticker-posts

बस फेऱ्याची कमतरता : प्रवाशांचे हाल

बस फेऱ्याची कमतरता : प्रवाशांचे हाल


सरपंचसह ग्रामस्थांची एसटी महामंडळाकडे धाव


प्रतिनिधी नासीर शेख 
पातूर : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले पातुर तालुक्यातील ग्रामीण भागात एसटी महामंडळाच्या बस फेऱ्याची कमतरता असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले चतारी पर्यंत येत असलेल्या बस फेऱ्या खेट्री पर्यंत वाढविण्याची मागणी खेट्रीचे सरपंचसह ग्रामस्थ गजानन लांडे,रोजगार सेवक संघटनेचे पातूर तालुका अध्यक्ष तसावर खान, भाजपचे कार्यकर्ते बाळकृष्ण ताले, यांनी एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक अधिकारी शुभंगी शिरसाठ यांच्याकडे बुधवार दि, १५ मे रोजी चर्चा करून निवेदन दिले, तसेच बाळपुर खेट्री बस फेरी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती.मात्र गेल्या ८ ते १० महिन्यापासून बंद करण्यात आली आहे.त्यामुळे प्रवाशांना खाजगी वहनात प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावे लागत आहे.त्यामुळे अकोला येथून पातूर तालुक्यातील चतारी पर्यंत येणाऱ्या बस फेऱ्या व बाळापूर बस फेरी त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.



प्रवाशांचे जीव मुठीत घेऊन प्रवास !
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले पातुर तालुक्यातील खेट्री, शिरपूर चांगेफळ व अतिदुर्गम भागात बस फेऱ्यांची कमतरता असल्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनात जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने अनेक अपघात घडले असून, मोठी घटना होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही

प्रतिक्रिया
बस फेऱ्या वाढविण्याबाबत सरपंचसह ग्रामस्थांचे निवेदन प्राप्त झाले असून, त्या भागात सुरू असलेल्या बस फेऱ्या तसेच रस्त्यांची पाहणी करून प्रवाशांच्या सोयीसाठी बस फेऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न करूशुभांगी य. शिरसाठ विभागीय नियंत्रक अधिकारी एसटी महामंडळ अकोला


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या