वैशाख पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात ३७४ प्राणी
अकोला- वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या विस्तीर्ण काटेपूर्णा अभयारण्यात बौद्ध पोर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात वन्यजीव व प्राणी गणना उत्साहात पार पडली. यावेळी महाराष्ट्रातील विवीध जिल्ह्यातुन आलेल्या वन्यप्रेमी व पर्यटकांनी २३ मे रोजी दुपारी २ वाजेपासुन अभयारण्यात निर्माण केलेल्या पानवठ्यालगत असलेल्या एकूण १० नैसर्गिक मचानावर रात्रभर जागे राहून २४ मे च्या दुपारी १२ वाजेपर्यंत विवीध वन्यप्राण्यांच्या हालचालीच्या नोंदी घेत प्राणी गणना केली. हौशी पर्यटक व वन्यजीव प्रेमी वैशाख पोर्णिमेच्या या रात्रीची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात. या रात्री चंद्र अधीक प्रकाशमान असल्यामुळे पानवठ्यावर येणारा प्राणी मचानावरुन सहज टिपता येतो तसेच वैशाख पोर्णिमेचा दिवसही तुलनेने जास्त उष्ण असल्यामुळे या रात्री वन्यजीव पाणी पिण्यासाठी रात्रीच्या वेळी पानवठ्यावर येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच वनविभागाच्यावतीने दरवर्षी प्राणी गणनेचे आयोजन म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला केले जाते.
सुमारे ६५०० हेक्टर क्षेत्रात वसलेल्या काटेपूर्णा अभयारण्याच्या उत्तरेस नैसर्गिक जलाशय असून पुर्वे कडील वनपरिक्षेत्रात नैसर्गिक जलस्त्रोत कमी असल्याने वनविभागाच्यावतीने ठिकठिकाणी कृत्रीम पानवठे तयार करण्यात आलेले आहेत. याच पानवठ्याच्या भोवती वन्यप्रेमींना प्राण्यांच्या नोंदी घेण्यासाठी ठरावीक उंचीवर लाकडी मचान तयार करण्यात आले होते. जैवविविधता आणि विवीध प्रकारच्या वनसंपदेने नटलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात बिबट, आस्वल, चौसिंगा, काळवीट, नीलगाय, चितळ, रानडुक्कर, सायाळ, खोपळ, रानकुत्रे, सांबर तसेच हरियाल, नौरंग, सर्पगरुड, सातभाई, रातवा, खंड्या, चंडोल, घार, तुरेवाला सर्पगरुड, टकाचोर, तांबट आदी पक्ष्यांच्या प्रजाती पाहावयास मिळून एकूण ३७४ प्रजाती बघावयास मिळाल्या.
बिबट- ०४
रानडुक्कर- ८७
सायाळ - ०८
निलगाय- ८७
चितळ- ९३
वानर -५२
मोर- २६
मसण्याउद - ०२
ससा - ०९
लाडगा- ०२
सांभार -०२
चिंकारा - ०२
एकूण -३७४
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या