Ticker

6/recent/ticker-posts

"मै मन की बात नही काम की बात करने आया हु"- डॉ. अभय पाटील

"मै मन की बात नही काम की बात करने आया हु"- डॉ. अभय पाटील



पातूर तालुका प्रतिनिधी - गुलाब भाऊ अंभोरे
या देशातील लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. प्रत्येक पक्ष, प्रतेक उमेदवार आप आपली बाजी मारण्यास गुंतला आहे. अकोला जिल्हा मधून तिहेरी लढत दिसत आहे.१) वंचित मधून प्रकाश आंबेडकर , महा विकास आघाडी मधून काँग्रेसचे डॉ. अभय पाटील, आणि भाजप मधून की ज्यांचे वडील २० वर्ष पासुन अकोला जिल्हा सोडलाच नाही. यांचे सुपुत्र अनुप संजय धोत्रे, या तिघांमध्ये रंगत होणार आहे. यामध्ये अकोलातून कोण बाजी मारणार आहे ते २६ तारखेलाच संध्या काळी कळणारआहे. महा विकास आघाडी मधून काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचे गावोगावी सभा भेटी सुरु झाल्या आहेत. दि.१५ एप्रिल २०२४ रोजी डॉ. अभय पाटील यांचा ग्राम विवरां येते, संध्या काळी ६ वजात दौरा होता दरम्यान मोठी सभा घेऊन आपले विचार सांगितले. हल्लीं असलेले सरकार ने या देशाची परिस्थिती फार बिघडविली. आमदार नितीन भाऊ देशमुख यांनी सरकारवर घनघात आरोप करून भाजप चे पितळ उघडे केले. ते आरोप नसून सत्य आहे. असे ते म्हणाले. नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन भाजपची पोळी भाजून घेत आहे. ते पुढे म्हणतात, २०१४ मध्ये सब का विकास शेतकऱ्यांच्या प्रतेक खात्यात १५, लाख रू. जमा होतील. शेतकऱ्या चया मालाला दाम दुप्पट भाव देऊ, परंतु तसे झाले नाही शेतकरी नाराज झाले. हे सरकार खोटे आश्वासन देतो २०२१ परेंत कोणीच बिना घराचं राहणार नाही. परंतु ५० टक्के लोक कुळाच्या घरात राहतात. घर घर नळ घर घर पाणी, परंतु गावात पाण्याचा पत्ता नाही. पूर्ण देशाचं खाजगीकरण केले. देवाच्या नावावर, हिंदूच्या नावावर खोटे बोलून मतदान घेतो. परंतु आता सर्वांच्या लक्षात आले आहे भाजप खोटे आश्वासन देत आहे,  असे आमदार नितीन भाऊ देशमुख म्हणाले.

       सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे...

डॉ. अभय पाटील आपल्या भाषणात सांगतात, मी मन की बात सांगायला नाही आलो, मी काम की बात सांगायला आलो. या सरकारने या देशाची परिस्थिती फार बिकट केली आहे. देशातील लोकशाही नष्ट केली आहे.२०१४ ला या सरकारने सांगितले होते की इस देश का काला धन लाऊंगा aur इस किसनो के खतेमे १५, लाख रू. दुंगा. या देशातील गोर गरिबांच्या २२, हजार सरकारी शाळा बंद केल्या. या देशाचं पूर्ण खाजगी करण केलं. बहुजन समाज हा शिकून पुढे चालला म्हणून शाळा बंद केल्या जातात. म्हणजे शिक्षण घेणे बंद होईल शिक्षण बंद झाले म्हणजे नोकरी नाही, नोकरी नाही म्हणजे विकास होणे थामल. अशी परिस्थिती विरोधकांनी निर्माण केली आहे. वंचित बद्दल लोकांचा आढावा घेतला असता, त्यांच्या नजरा फार वेगळ्या दिसतात, त्यांच्यामते वांचीतला दिलेले मतदान हे भाजपला चाललं असे लोकांचे आरोप आहेत. बरीच जनता, सताधरी लोक आरोप करतात की वंचित आघाडी ही बीजपाची बी टीम आहे. जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, यानी गंभीर आरोप केलें होतें की प्रकाश आंबेडकर हे फक्त मत खाण्यासाठी उभे असतात. डॉक्टर आंबेडकर यांच्या नावावर मते मागतात, असे अनेक आरोप केले आहेत. या कार्यक्रमाला उपस्थितीत डॉ. अभय पाटील, नितीन देशमुख, माजी आमदार दाळू गुरजी, काँग्रेस चे उपद्येक्ष शाम उमाळकर, गावातील नागरिक रामदास धोत्रे, दीपक बोचरे आणि गावातील तमाम नागरिक उपस्थित होते. .



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या