Ticker

6/recent/ticker-posts

निवडणुकीसाठी भाजपाचे बूथ विजय अभियान प्रत्येक बुथवर 370 मते वाढविण्याचा निर्धार प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांची माहिती

निवडणुकीसाठी भाजपाचे बूथ विजय अभियान प्रत्येक बुथवर 370 मते वाढविण्याचा निर्धार प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांची माहिती 


लोकसभा निवडणुकीत ''अब की बार 400 पार'' ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रत्येक बुथवर 370 मते वाढविण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री.पाठक बोलत होते. प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. यासाठीचे बूथ विजय अभियान बुधवार 3 एप्रिल पासून सुरु होणार असून हे अभियान 6 दिवस चालणार आहे, असेही श्री.पाठक यांनी सांगितले. 
श्री.पाठक म्हणाले की, विधानसभा पातळीवर पक्षाच्या बूथ स्तरीय कार्यकर्त्यांचे तसेच पन्नास प्रमुखांचे मेळावे या अभियानात आयोजित केले जाणार आहेत. मागील तीन निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा आढावा घेऊन यावेळच्या निवडणुकीसाठी मतदानाचे उद्दिष्ट निश्चित केले जाणार आहे. या अभियानात प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा 370 मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. या अभियानात समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्य़ाचे लक्ष्य आहे, असेही श्री.पाठक यांनी नमूद केले. 
घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर, वाहनावर स्टिकर्स लावणे, लाभार्थींशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपा चा झेंड़ा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवा वर्ग, महिला अशा समाजातील विविध घटकांसाठी 5 समूह बैठकाही घेण्यात येतील, अशी माहितीही श्री.पाठक यांनी दिली. भाजपा शी संबंधीत नसलेल्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचे कार्य व योजना पोहोचवून भाजपा ला मत देण्यासाठी त्यांचे मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बूथपासून दूर रहाणा-या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येईल तसेच जिथे महायुतीचा उमेदवार असेल तिथे पक्षाची मते महायुती उमेदवारालाच जातील याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे श्री. पाठक यांनी सांगितले.


 
भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई रासा पण शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या नामांकन पत्र आज दिनांक 3 एप्रिल बुधवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता भाजपा कार्यालय येथून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार संजय कुटे आमदार अमोल मिटकरी आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवालआमदार आकाश फुंडकर आमदार श्वेता ताई महाले माजी आमदार चैनसुख संचेती माजी आमदार विजयराव जाधव माजी राज्यमंत्री डॉक्टर रणजीत पाटील विजय अग्रवाल माजी आमदार वसंतराव खोटे रे आमदार लखन मलिक माजी आमदार तुकाराम बिडकर विजयराव देशमुख माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया श्रीराम दादा पिंजरकर संदीप पाटील श्याम बडे अनंतराव देशमुख नकुल देशमुख कृष्णा अंधारे उषा विरक अश्विन नवले विठ्ठल सरप योगेश अग्रवाल सुनील अवचार वैशाली निकम चंदा शर्मा गीतांजली ताई शेगोकार सुमन ताई गावंडे वैशालीताई शेळके चंद्रशेखर पांडे गुरुजी श्रीकृष्ण मोरखडे किशोर पाटील जयंत मसने,ले विजय अग्रवाल तेजराव थोरात बळीराम सिरस्कार, योगेश शाहू, कुसुम भगत मोनिकाताई गावंडे जयश्री फुडकर हरिनारायण माकोडे राजेश रावणकर शंकरराव , बोरकर बाळासाहेब आपोतीकर हिरासिंग राठोड रमण जैन एडवोकेट मोती सिंग मोहता डॉक्टर अशोक ओलबे, , योगेश अग्रवाल उमादेवी शर्मा, कृष्णा शर्मा, संजय बडोणे , हरीश आलीमचंददाणी, विनोद मनवाणी , संतोष पांडे निलेश निनोरे अंबादास उमाळे देवेंद्र देवर, नानक राजपाल, शुभराज राजपाल, सारिका देशमुख नगरसेवक नगरसेविका सारिका जयस्वाल, तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी महायुतीचे हितचिंतक तसेच सामाजिक धार्मिक अध्यात्म व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आर्थिक क्षेत्रातील मान्यवर नामांकन पत्र दाखल करताना उपस्थित राहणार आहे



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या