शालेय विद्यार्थ्यांने उचलले टोकाचे पाऊल, शिक्षकांकडून त्रास देत असल्याची पालकांची तक्रार
अकोला : शहरात काळीज सुन्न करणारी एक घटना घडली आहे. एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. दोन शालेय शिक्षकांकडून मारहाण आणि मानसिक जाच होत असल्याने या त्रासाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अल्तमेश बेग इमराण बेग असं आत्महत्या करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचं नाव आहे. तो ज्या शाळेत शिकत होता तेथे त्याला मोठ्याप्रमाणावर मानसीक त्रास होता. दोन शिक्षक त्याला सतत मारहाण करायचे आणि मानसीक त्रास द्यायचे. या त्रासाला कंटाळून त्याने हा निर्णय घेतल्याचं आरोप पालकांनी केला. दरम्यान, अल्तमेश अकोला शहरातील खदान परिसरातील
मुल्लानी चौक रहिवासी होता. त्याच परिसरातील गुरुनानक विद्यालयात तो शिक्षण घेत होता. या वर्षी तो ९ वीच्या वर्गात शिकत होता. काल शाळेत झालेल्या किरकोळ कारणांवरून अल्तमेशला शाळेतील दोन महिला शिक्षकांनी मारहाण केली. इतकच नव्हे तर त्याला शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली, असं विद्यार्थ्यांच्या पालकांनी म्हटलंय आहे. घडलेल्या प्रकारानंतर सायंकाळी अल्तमेश घरी परतला आणि शाळेतील घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. तेव्हा आई-वडिलांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर सायंकाळी राहत्या घरातील वरच्या खोलीमध्ये तो अभ्यासासाठी जात असल्याचं सांगून गेला. रात्री बराच वेळ झाला तो खाली जेवणासाठी नं आल्यानं आई त्याच्याकडे गेली. पण त्यांना आपला मुलगा फासावर लटकलेला दिसला. या प्रकरणी खदान पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांद्वारे गुरुनानक शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्या जाणार असल्याचे खदान पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी गांभिर्यानं दखल घेऊन संबंधित शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मृत अल्तमेशच्या नातेवाईकांनी केलीय.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या