ठाणेदार यांच्यावर कार्यवाही न झाल्यास गावकऱ्यांचा अत्मदहनचा इशारा
पातूर:- पातूर तालुक्यातील पांढूर्णा येथील 24 जानेवारी रोजी गावकऱ्यांना पिंपळडोळी, व पांढूर्णा ग्राम पंचायतीचा प्रथम ठराव घेवून कमान उभारली असता चांनी पोलिस स्टेशन चे ठाणेदार यांनी हेतुस्पुरस्परपने कमान पडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. पोलिस अधीक्षक अकोला तसेच पोलिस महांचालक मुम्बई, विषेश पोलिस महानिरीक्षक अमरावती यांचे कडे तक्रार केली असून ठाणेदार यांचेवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करुन अट्रोसिट अन्तर्गत कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने गावकरी सिध्दार्थ सोनोने व समाधान सोनोने यांनी पोलिस अधीक्षक अकोला यांच्या कार्यालयासमोर 16 फेब्रुवारीला रोजी आत्महदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास यासाठी पोलिस अधीक्षक अकोला जबाबदार राहतील अश्या प्रकचे निवेदन पोलिस अधीक्षक अकोला व जिल्हा अधिकारी अकोला यांना दिली आहे. तरी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
0 टिप्पण्या