स्व.आकाश प्रकाशराव ठाकरे यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे):- दि.११/०२/२०२४
आपल्या स्व. मित्राच्या प्रती प्रेम भावना जपत समाजकार्याची चळवळ हाती घेवून सुरु केलेल्या रक्तदान रुपी महादानाचे सुरु केलेले कार्य अविरत आजीवन सुरु ठेवण्याच्या उद्देशाने परिवर्तन बहु. संस्था कारंजा लाड जि.वाशिम स्व.आकाश ठाकरे मित्र परिवार कारंजा लाड जि.वाशिम यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात कार्यक्रमात दि. ११/०२/२०२४ रोजी स्थानिक श्री. दत्त मंदिर सभागृह दत्त मंदिर चौक कारंजा येथे शहरातील सर्व सुजान कर्तव्यदक्ष रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत बहुसंख्येने सहभाग नोंदवून रक्तदानाचे महादान केले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंचायत समिती कारंजाचे मा. गटशिक्षणाधिकारी माने साहेब यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोकरावजी सार्वे हजर होते. या शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन चेतन गावंडे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन मनीष एगलदरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता परिवर्तन बहु.संस्था कारंजा, स्व. आकाश ठाकरे मित्र परिवार यांनी अथक परिश्रम घेतले.
पुढील रक्तदान शिबीर हे जूनच्या पहिल्या आठवड्यात राहील असे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले. त्यावेळी देखील संस्थेचे सर्व पदाधिकारी व रक्तदाते आप्त स्वकियांनी रखरखत्या उन्हात सर्वच रक्त गटाचा तुटवडा भासु नये व कोणाचेही प्राण रक्तावाचून जावू नये या हेतूने बहु संख्येने रक्तदान रुपी चालवलेली चळवळ बळकट करण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा असे आवाहन परिवर्तन बहु.संस्था कारंजा लाड जि.वाशिम स्व.आकाश ठाकरे मित्र परिवार कारंजा लाड जि.वाशीम यांच्या वतीने करण्यात आले.
पूर्व पश्चिम विदर्भातील शेतकरी झाला निसर्गापुढे हतबल.मागील पावसाळा विलंबाने तर त्यानंतर महापूर व अवकाळीच्या प्रचंड कहराने शेतकऱ्यांचे पिके उध्वस्त. "शासनाला मात्र शेतकऱ्यांची दयामाया उरली नसल्याने आधी अस्मानी तर नंतर सुलतानी" संकटामुळे शेतकऱ्यामध्ये सरकार विषयी असंतोष."
वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : चालू वर्षाचे प्रारंभी ऐन हिवाळ्याचे उत्तरार्धात,पावसाचा कहर (वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिट) दि. 10 फेब्रुवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत होणार असल्याची भविष्यवाणी आमचे मित्र वाशिम जिल्ह्याचे लोकप्रिय हवामान अभ्यासक गोपालभाऊ गावंडे ( रुई गोस्ता ) यांनी डिसेंबर मध्ये केली होती.आणि त्यांच्या हवामान अंदाजानुसार दि.10 फेब्रुवारी 2024 रोजी,यवतमाळ, धर्माबाद, अमरावती,धामणगाव रेल्वे, देवळी, वर्धा,गोंदियाचा काही भाग,चंद्रपूर, हिंगणघाट, भद्रावती,भोकर ,नांदेड , गोंदिया, भंडारा इत्यादी ठिकाणी गारपिटीचा पाऊस होऊन शेतकऱ्याची हाताशी आलेली कपाशी,गहू, हरभरा,भाजीपाला पिके, आंबा, संत्रा इत्यादीच्या फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. शिवाय दि. 11 फेब्रुवारी रोजी सुद्धा यवतमाळ ,धर्माबाद, माहूर, नांदेड भागात प्रचंड गारपिट झाल्याचे वृत्त असून,येत्या दि14 फेब्रुवारी नंतर देखील अवकाळीचे संकट पश्चिम व पूर्व विदर्भावर कायम रहाणार आहे. त्यानंतर दि 15 फेब्रुनंतर 21 फेब्रुवारी पर्यंत उघाड व परत 22 फेब्रुवारी रोजी अवकाळीचे संकट असल्याचा हवामान अभ्यासक गोपालभाऊ गावंडे यांचा अंदाज आहे.परंतु ह्या आस्मानी संकटाने विदर्भाचा शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सोयाबीन,कपाशी, तुर ह्या पिकांचे उत्पादन घटलेले आहे. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्चही भरून निघत नाही. त्यात मायबाप सरकार कडून शेतमालाला सोयाबीन कपाशीला भाव नाही तर दुसरीकडे व्यापाऱ्यांच्या दाळ दाण्याचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अद्याप पर्यंत नुकसान भरपाई आणि पिकविम्याची रक्कमही वळती करण्यात आलेली नाही.त्यामुळे विदर्भाच्या शेतकरी राजामध्ये तिव्र असंतोष निर्माण होत असल्याचे वास्तव आहे. तरी आतातरी सरकार शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल काय ? आणि शेतमालाला भाव देणार काय ? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी राजाकडून चर्चीला जात असल्याचे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
सक्षम सामजिक संघटनेद्वारा आयोजीत दिव्यांग व आदिवाशी सामूहीक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन
वाशिम : येत्या दि.२६/२/२०२४ रोजी, अकोला जिल्ह्यातील सक्षम सामाजिक संघटनेद्वारा दिव्यांग व आदिवासी सामुहीक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सक्षम समाजिक सघंटने तर्फे नागरीकांना विनम्र आवाहन करण्यात येते की, जर आपल्या संपर्कात अपंग दिव्यांग बांधव असतील कि ज्यांची लग्न जूळलेले आहेत परंतू काही आर्थिक अडचणी मूळे त्यांना विवाह करणे पैशाअभावी शक्य नाहीत अश्या विवाहेच्छुकांकरीता सघंटनेद्वारे त्यांचा विवाह हा सामूहिक सोहळ्यामधे मोठ्या थाटा माटात लावून देण्याचे ठरविण्यात आले आहे .तरी अश्या गरजवंत विवोहोच्छुक लोकांपर्यत हा संदेश पोहचवावा व जर वर किंवा वधू दोघांपैकी कोणी एक पण अपंग असेल तर त्यांना समाज कल्याण विभागा तर्फे प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपयांचे अनूदान देण्यात येईल व सघंटनेच्या वतिने तसेच उपस्थित प्रमूख पाहूणे मंडळींच्या वतीने सुद्धा नवविवाहित वर वधू यांना जिवनोयोगी साहित्याच्या भेट वस्तू देण्यात येतील. तरी संपर्क :- सक्षम सामाजिक संघटन, अकोट व तेल्हारा मो नं 9309922886 किंवा 7038000702 यांचेशी संपर्क साधावा. टिप :~ सामूहिक विवाह सोहळा मर्यादित जोडप्यांकरिता असून प्रथम नाव नोंदवणाऱ्या जोडप्यांना प्राधान्य देण्यात येईल.
नेक्स्ट स्टेप अकॅडमी तर्फे निशुल्क रामानुजन टॅलेंट स्पर्धा संपन्न
कारंजा (जिल्हा प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या कलेला, सुप्तगुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील प्रतिभा इतरांसमोर यावी या करिता कारंजा शहरातील नामांकित नेक्स्ट स्टेप अकॅडमी तर्फे दी. 11 फेब्रुवारी रोजी श्री कामाक्षा देवी मंदिर मध्ये वर्ग 3 री ते 9 वी च्या विद्यार्थ्याकरिता रामानुजन टॅलेंट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकरिता शहरातील एकूण 850 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ही स्पर्धा एकूण चार गटात विभागण्यात आली होती ज्यामध्ये 3 री व 4 थी चा एक गट, 5 वी चां दुसरा गट , 6 वी ,7 वी यांचा तिसरा गट, तर 8 वी व 9 वी चा चौथा गट ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना गणित या विषयावरील प्रश्न विचारण्यात आले होते आणि स्पर्धेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नेक्स्ट स्टेप अकॅडमी तर्फे पेपर पॅड देण्यात आले.
स्पर्धेचा निकाल 25 फेब्रुवारी लां लावण्यात येणार असून स्पर्धेच्या प्रत्येक गटातील यशवंत विद्यार्थ्यांना प्रथम बक्षीस म्हणून स्टडी टेबल, दुसरे बक्षीस स्कूल बॅग तर तिसरे बक्षीस म्हणून स्टडी किड्स देण्यात येईल.
या स्पर्धेकरिता नेक्स्ट स्टेप अकॅडमी चे शुभम गोरटे सर, हेमंत राठोड सर, सारंग गोरटे सर, रुपाली गोरटे मॅडम , ऋतुजा मॅडम , फुलाडी मॅडम ,सुशांत सर यांनी व्यवस्थापन केले तसेच स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सुनील गोरटे सर, सौ उज्वला गोरटे मॅडम, प्रतीक चीमागावे ,अनुज देशमुख सर , मीनल शंकरपुरे ,सोनाली हिंगमिरे यांनी मोलाचे योगदान दिले. असे वृत्त शुभम गोरटे यांनी आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांना कळवीले आहे.
राज्यस्तरिय मिनिगोल्फ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे यावर्डीच्या 8 विद्यार्थीनींना गोल्ड मेडल
कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ) : राज्यस्तरीय शालेय मिनी गोल्फ स्पर्धा २०२३-२४ विभागीय क्रीडा संकुल मानकापूर,नागपूर येथे येथे दिनांक ०६ ते १० फेब्रुवारी दरम्यान आयोजित केली होती. त्यामध्ये बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी तालुका कारंजा जिल्हा वाशिम या शाळेच्या खेळाडूंनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून नेत्रादिपक कामगिरी बजावलेली आहे. मिनी गोल्फ या खेळामध्ये टीम इव्हेंट राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला त्यामुळे शाळेच्या एकूण आठ विद्यार्थीनी गोल्ड मेडल प्राप्त झाले.
कोल्हापूर विभाग, नाशिक विभाग व नागपूर विभाग यांच्यावर मात करत अतिशय चपळतेने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. सदर टीम मध्ये वर्ग 10 विच्या विद्यार्थिनी वेदिका करडे , जानवी पारे, सृष्टी करडे, प्राची आडोळे, मुक्ता कापसे, आरती बोनके , प्रशिका मानवटकर, आचल दिहाडे इत्यादि खेळाडू सहभागी होते. सदर विधार्थिनीना वर्ल्ड मिनीगोल्फ स्पोर्ट फेडरेशनचे अध्यक्ष लिफ मैथिलबर्ग यांचे हस्ते मेडल व ट्राँफीचे वितरण करण्यात आले.
यापूर्वी विद्यालयचे अनेक खेळाडू राज्यस्तरिय स्पर्धेत सहभागी झाले होते परंतु राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पहिल्यांदा मिळाला आहे.त्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचे काल रात्री 9:30 कारंजा बस स्टैंड वर आगमन होताच गटशिक्षणाधिरी श्रीकांत माने, विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भड, शिक्षक अनिल हजारे,गोपाल काकड यांनी जल्लोशात स्वागत करून सत्कार केला.
सर्व खेळाडूंचे व शाळेचे क्रीडा शिक्षक प्रशिक्षक राजेश शेंडेकर यांचे, पालक वर्ग, संस्थाध्यक्ष योगेश खोपे, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, मुख्याध्यापक विजय भड, शिक्षक वृंद गोपाल काकड, अनिल हजारे शिक्षकेत्तर कर्मचारी देविदास काळबांडे, हरिदास गंदरे,भालचंद्र कवाने,राजु लबडे,राजेश लिंगाटे, राजेंद्र उमाळे, तसेच कार्ली व यावर्डीचे गावकरी मंडळी यांनी बस स्टँड कारंजा येथे पेढे वाटुन, हारार्पण करून व फटाके फोडून जल्लोशात स्वागत केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्यात.असे वृत्त मुख्याध्यापक विजय भड यांनी आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांना कळवीले आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या