Ticker

6/recent/ticker-posts

लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे वृद्ध कलाकार मानधन वाढीचा निर्णय घेणार काय ?

लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे वृद्ध कलाकार मानधन वाढीचा निर्णय घेणार काय ?


 वाशिम : गेल्या पाच वर्षात महागाईने प्रचंड उच्चांक गाठलेला असून तुटपुंज्या मानधनात आपली गुजराण (उदरनिर्वाह व औषधोपचार) करतांना वयोवृद्ध कलावंताच्या नाकीनऊ येत आहेत.त्यातच मागील काही वर्षात येऊन गेलेल्या,कोव्हिड 19 कोरोना महामारी आल्यापासून, कलाकारांच्या लोककलेच्या कार्यक्रमात कमालीची घसरण होऊन,लोककलेचे पारंपारिक कार्यक्रम बंद पडल्यात जमा झाल्याने,पारंपारिक कलाकारांवर तर उपासमारीचे संकट कोसळत असून,या महागाई आणि बेरोजगारीने पारंपारिक लोककलेच्या व इतरही कलेच्या कार्यक्रमावर उदरनिर्वाहाकरीता अवलंबून असणाऱ्या,सर्वच कलाकारांना जीवन जगणेच कठीन होऊन गेलेले आहे. त्यामुळे वृद्ध कलाकाराकडून वेळोवेळी,महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या तुटपुंज्या मानधनात वाढ व्हावी.अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून वेळोवेळी होत असतांनाही शासनाचे मात्र या विषयाकडे अक्षम्य दुर्लक्ष्य असून,शासन लोककलेच्या कलाकाराबाबत उदासिन असल्याने, कलाकारामध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.या पार्श्वभूमिवर अनेकवेळा विदर्भ कलावंत संघटना कारंजा यांनी, वृद्ध कलकारांचे मानधन वाढवण्याची मागणी केली असून, महारा आमदारांनी विधानसभेत कलाकाराच्या समस्या बाबत लक्ष्यवेधी मांडण्याची विनंतीही केली आहे.परंतु ना याकडे कुण्या आमदाराचे लक्ष्य आहे ? ना सांस्कृतिक मंत्री सकारात्मक आहेत ? त्यामुळे आता विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांनाच साकडे घातले असून,वृद्ध कलाकाराच्या मानधनात वाढ करून सरसकट सर्व कलाकारांचे मानधन दरमहा किमान पाच हजार रुपये करण्याची मागणी केलेली असून, मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब लोकसभा निवडणूकीच्या आचार संहितेपूर्वी,वृद्ध कलाकार मानधन वाढीचा निर्णय घेणार काय ? याकडे कलाकारांचे लक्ष्य लागले आहे.

प्रहार जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष आ.बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती तर्फे प्रहार सेवाभावी उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर,रुग्णवाहिका लोकार्पण,दिव्यांग व शेतकरी मेळाव्याचे भव्य आयोजन!


कारंजा (लाड) (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : तळागाळातील ग्रामिण भागातील जनतेच्या हृदयपटलावर ठसलेल्या आणि दिव्यांग,निराधार,शेतकरी, कामगारा करीता 80% समाजकारण आणि 20% राजकारण करीत महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःच्या अस्तित्वाचा आगळा वेगळ ठसा उमटविणाऱ्या आदर्श राजकीय पक्ष म्हणून गणल्या जाणाऱ्या, "प्रहार जनशक्ती पक्षाकडून" कारंजा (लाड) येथून जवळच असलेल्या, ग्राम दोनद बु. येथे, पंचक्रोशीतील ग्रामिण जनसामान्यांकरीता भव्य रोग निदान शिबिर,रक्तदान शिबिर, रक्ततपासणी शिबीर , प्रहार तर्फे तालुक्यातील गरजू रुग्नाकरीता, मोफत प्रवासा करीता रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा, दिव्यांग व शेतकरी मेळाव्याचे आयोजन येत्या रविवारी दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी आ. बच्चुभाऊ कडू अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान महाराष्ट्र राज्य,यांच्या उपस्थितीत भव्य आयोजन करण्यात आले आह.अशी सविस्तर माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा जिल्हाध्यक्ष हेमेंद्र ठाकरे यांनी कारंजा येथे दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 06:00 वाजता महालक्ष्मी मंगल कार्यलय येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेमधुन बोलतांना दिली. येत्या रविवारी ग्रामिण
गावकरी व प्रहार जनशक्ती 
पक्षाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचा उद्देश शेतकऱ्याचे व दिव्यांगाचे प्रश्न सोडवणे हा आहे. रविवार दि . 18 फेब्रुवारी 2024 रोजी दोनद बु. येथे सकाळी 10:00 वाजता आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान व रक्त तपासणी शिबिर, दुपारी 03:00 वाजता मा.आ. बच्चुभाऊ कडू यांचा शेतकरी व
दिव्यांग बांधवां सोबत संवाद व मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन असणार आहे तसेच यावेळी कृषी विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक सुद्धा होणार आहे. त्यानंतर रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा होणार आहे. यावेळी आ. बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते तालुक्यातील समाजसेवी व सेवाव्रती कार्यकर्त्यांचा भव्य सत्कार सुद्धा करण्यात येणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली. तसेच शेवटी हास्य कवी मिर्झा बेग यांच्या हास्य कवी संमेलनाचा कार्यक्रम सुद्धा
होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या पत्रकार परिषदेला हेमेंद्र ठाकरे वाशिम जिल्हा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष, निलेश लवटे, गजानन भाऊ लोखंडकर, दत्ताभाऊ पाकधने, संजय गोटे हे उपस्थित होते. तसेच पत्रकार परिषदेला शहरातील व ग्रामीण भागातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.असे वृत्त पत्रकार परिषदेला उपस्थित प्रत्यक्षदर्शी असलेले आमचे जिल्हा प्रतिनिधी तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कळवीले आहे.


सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांना पडला वृध्द कलावंतांच्या समस्यांचा विसर ! मानधन वाढ न झाल्यास आगामी निवडणूकांवर बहिष्कार टाकु.-संजय कडोळे


वाशिम - गेल्या पाच वर्षापासून जिल्हयात सर्वच अशासकीय समित्यांचे गठनच झाले नसल्यामुळे सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांना वृध्द कलावंतांच्या समस्यांचा विसर पडल्याची खंत असून वृध्द कलावंतांच्या हालअपेष्टांना पारावार उरला नाही.सरकारने वृद्ध कलाकार मानधनात वाढ करून दरमहा किमान पाच हजार रुपये मानधन करावे व वृद्ध साहित्यीक कलकार मानधन समितीचे गठन करून गेल्या पाच वर्षाचे वृद्ध कलाकाराचे मानधनाचे अर्ज निकाली काढून त्यांना मानधन सुरू करावे.याबाबत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास जिल्हयातील सर्व कलावंत आगामी सर्व निवडणूकांवर बहिष्कार टाकतील.असा इशारा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी दिला आहे.
  कडोळे यांनी म्हटले आहे की, समित्या गठनाअभावी जिल्ह्यातील शेकडो वृध्द कलावंतांचे प्रस्ताव लालफितशाहीत अडकले आहेत. व उतारवयात जगण्याची धडपड करणारे वृध्द कलावंत मानधनापासून वंचित आहेत. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना राज्याच्या मुख्य सचिवांचे आदेश असतांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत शासकीय अधिकारी यांचीही निवड समिती स्थापन न करता,या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. हक्काचे मानधन मिळण्याच्या वाटेकडे डोळे लावून असलेले कित्येक वृध्द कलावंत मृत्यु पावले आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी विदर्भ लोककलावंत संघटनेने पदरमोड करीत अनेक आंदोलने उभी केली.मात्र निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही.एखादेवेळी दगडालाही पाझर फुटला असता,परंतु स्थानिक सत्ताधारी आमदार आणि पालकमंत्री यांना लोककलावंताची कोणतीही दयामाया येत नाही.ही दुदैवाची गोष्ट असून याचे आम्हाला शल्य आहे.जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि पालकमंत्री स्वतःची सत्ता भोगण्यात मश्गुल झालेले दिसत आहेत.त्यामुळे कलाकार निवड समितीचे त्वरीत गठीत न झाल्यास व वृद्ध कलाकाराच्या तुटपुंज्या मानधनात वाढ न झाल्यास,जिल्हयातील सर्व लोककलावंत आगामी निवडणूकीवर एकजूटीने बहीष्कार टाकणार असल्याचा इशारा संजय कडोळे यांनी दिला आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या