सप्तखंजेरी राष्ट्रिय प्रबोधनकार सत्यपाल महाराजांना "महाराष्ट्र-भूषण" देण्यात यावा- संजय कडोळे
"मंगळवारी दि २ जानेवारी २०२४ रोजी सांस्कृतिक कार्य विभागाच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होणार."
कारंजा (लाड): वैदर्भीय मातीमधील कोहिनूर रत्न असलेले,बहुजन समाजातील थोर सप्तखंजेरी राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील सर्वच गावखेड्यात व्यसनमुक्ती प्रबोधनाचे कार्यक्रम झालेले असून, महाराजांनी आजतागायत लाखो करोडो व्यसनाधिन व्यक्तींना व्यसनमुक्त केले आहे.महाराजांनी आपले संपूर्ण जीवन तहहयात, समाजप्रबोधनाकरीता खर्ची घातलेले आहे. शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारसरणीच्या,तळागाळातील ग्रामीण भागातील,बहुजन समाजातून आलेल्या या राष्ट्रिय प्रबोधनकाराने आपल्या शिवाय आपल्या विचारसरणीने , व्यसनमुक्ती प्रबोधना करीता जीवन व्यतीत करणारे शेकडो निःस्वार्थी शिष्य (पंकजपाल, कमलपाल, संदिपपाल, ऋषीपाल इत्यादी )निर्माण करून त्यांच्या रुपाने देखील महाराष्ट्रात व महाराष्ट्रा बाहेर भारतातही अखंडपणे राष्ट्रीय कार्यक्रमाच्या जनजागृती सोबतच व्यसनमुक्तीचे कार्य अखंडपणे सुरु आहे व भविष्यातही आचंद्र दिवाकरौ सुरु राहणारही आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात यावे ही संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे. त्यामुळे महाराष्ट्रीयन जनतेचा मागणीचा विचार करून,शासनाने सत्यपाल महाराज यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस आणि दूसरे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी उद्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत, गुरुवर्य सत्यपाल महाराजांना "महाराष्ट्र भूषण" देण्याचा निर्णय जाहीर करावा.असे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे, प्रदिप सोनोने, उमेश अनासाने, विजय खंडार यांनी प्रभू श्रीरामा चरणी साकडे घातले असून,यापूर्वीच अनेकवेळा जिल्हाधिकारी वाशिम यांचेमार्फत मुखमंत्री महोदय यांचेकडे निवेदन सुद्धा पाठवीले आहे. शिवाय वृत्तपत्राद्वारे वारंवार बातम्या प्रकाशित करून पाठपुरावा सुद्धा केला आहे.तरी मंगळवारी होणाऱ्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मंत्रीमंडळ बैठकीत काय निर्णय होणार याकडे तमाम महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे .
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या