Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी कर्ज व पिक विमा धोरणात बदल करा

शेतकरी कर्ज व पिक विमा धोरणात बदल करा


———————————————— अकोला जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे विधिमंडळा समोर साखळी उपोषण————————————————
अकोला— व्यापारी उद्योजकाप्रमाणे शेतीला सुलभ कर्ज पुरवठा करावा,पीक विमा धोरणात बदल करावा या मागण्यासाठी अकोला जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशन समोर दिनांक १२ डिसेंबर स्वदेशी दिनापासुन पासून साखळी उपोषणाचा मार्ग पत्करलेला आहे. 


     १२ डिसेंबर हा स्वदेशी दिन असून हुतात्मा बाबू गेनू यांचा स्मृतिदिन आहे. स्वदेशीसाठी शहिद बाबू गेनू यांनी बलिदान दिले.त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी अकोला जिल्ह्यातील शेतकरी भूमिपुत्र संजय मालोकार ,रमेश पाटील लोणाग्रेकर ,विलास नाकट साखळी उपोषणास बसले आहे. शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा केला जात नाही ,पिक विमा भरून सुद्धा योग्य दखल घेतली जात नाही, रासायनिक खतांच्या किमती वर निर्बंध नसल्याने ऐन पेरणीच्या वेळेस शेतकऱ्याला अवाच्या सव्वा भावात बी बियाणे व खते विकत घ्यावी लागतात .शेतीला लागणारे बी- बियाणे, अवजारे, खते यांच्या किमती आवाक्यातील असाव्या, वेळेवर न्याय कर्ज पुरवठा व्हावा व पिक विमा धोरणात बदल करावा या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी हे शेतकरी भूमिपुत्र अनेक वर्षापासून लढा देत आहेत. शासनाकडे, नाबार्डकडे, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, मा राष्ट्रपती महोदयाकडे पत्रव्यवहार करुन साकडे घालत आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या