Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांगांना बँक खात्यात अनुदान जमा होण्याची प्रतिक्षा

दिव्यांगांना बँक खात्यात अनुदान जमा होण्याची प्रतिक्षा



प्रतीनीधी- संजय कडोळे
कारंजा (लाड) : महाराष्ट शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत,संजय गांधी दिव्यांग अनुदान योजनेंतर्गत, दरमहा दिव्यांगाना प्रतिमाह - 1500 /- रु अनुदान अनुदान दिल्या जाते. वास्तवात दिव्यांग व्यक्तींच्या गरजा आणि प्रचंड प्रमाणात वाढती महागाई पहाता ते अतिशय तुटपुंजे आहे. परंतु तरीही बेरोजगार-निराधार-गरजू दिव्यांग त्यावरही समाधान मानतात. शासनाने महाराष्ट्रातील लाभाथ्यांचे माहे आक्टोंबर ते डिसेंबर पर्यंतचे अनुदान हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंजूर करून पाठवीले असल्याचे अधिवेशनात मंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी सांगीतले होते.मात्र कारंजा तहसिल कार्यालयाच्या दिव्यांग लाभार्थ्यांना अद्यापपर्यंतही ऑक्टोबर ते डिसेंबरचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात मिळालेले नाही.तरी कारंजा तहसिल कार्यालयाच्या तहसिलदार अपूर्वा बासूर,मॅडम (भाप्रसे) यांनी त्वरीत लक्ष्य देवून ऑक्टोबर ते डिसेंबरचे अनुदान दिव्यांगाच्या बँक खात्यात वळते करण्याची मागणी होत आहे. दुर्धर आजारग्रस्त, वयोवृद्ध, दिव्यांगाना घरपोच अनुदान मिळणार काय ? हिवाळी अधिवेशन काळात मंत्री महोदय ना.हसन मुश्रीफ यांनी दुर्धर आजारग्रस्त, वयोवृद्ध निराधार आणि दिव्यांगाना , संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निराधार योजनेचे अनुदान स्थानिक डाकघरा मधून (पोस्ट ऑफिसच्या) पोष्टमन यांच्या माध्यमातून घरपोच देण्याचे जाहीर केले होते. त्या निर्णयाची कारंजा तालुक्यात अंमल बजावणी करण्याची मागणी होत आहे. सध्या दुर्धर आजार ग्रस्त, दिव्यांग व ज्येष्ठ वयोवृद्धांना अनुदानाची रक्कम काढण्याकरीता संबधीत बँका किंवा बँकेच्या मदत केन्द्रावर अँटो रिक्क्षाने येरझार करावी लागते. त्यातही इंटरनेट सक्रिय नसले किंवा लाभार्थ्यांच्या हाताचे ठसे न उमटल्यास त्यांची गैरसोय होते.त्यामुळे निराधाराचे अनुदान घरपोच देण्याची मागणी होत असल्यामुळे यावर विद्यमान तहसिलदार अपूर्वा बासूर,मॅडम (भाप्रसे) यांनी निर्णय घेण्याची मागणी होत आहे.


 सर्व बँकानी एकाचवेळी निराधार अनुदानाचे वितरण सुरू करण्याची मागणी

 शासनाकडून निराधारांच्या बँक खात्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे अनुदान पाठवील्यानंतरही काही बँका लगेच तर अनेक बँका पंधरा पंधरा दिवस विलंबाने निराधाराच्या अनुदानाचे वितरण करतात. त्यामुळे काही निराधारांना लगेच अनुदान मिळते तर काही निराधारांवर बँकेच्या येरझारा करण्याची वेळ येते. त्यामुळे तहसिलदार अपूर्वा बासूर,मॅडम (भाप्रसे) यांनी तहसिल कडून सर्व योजनाचे अनुदान एकाच दिवशी बँकाकडे पाठवीण्या बाबत आणि संबंधीत सर्व बँकांनी एकाच वेळी वितरीत करण्याबाबतचे आदेश संबधितांना देण्याची मागणी होत आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या