Ticker

6/recent/ticker-posts

विकास कामाचेभूमीपुजन व लोकार्पण सोहळा

विकास कामाचेभूमीपुजन व लोकार्पण सोहळा


अकोला - अकोला पूर्व मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचे जीवन सुखकर व्हावे या उद्देशाने आज नाबार्ड-२ व शासन २५१५ निधी अंतर्गत विविध विकास आमदार रणधीर सावरकर यांनी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वासाने सपने नही बोलते हकीकत मे काम करते या पद्धतीने मतदारसंघातील दळणवळण सुविधा सोबत भौगोलिक सामाजिक आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व कोळी समाजाचे नेते बाळासाहेब आपोतीकर यांनी केले . अकोला पूर्व तीन अनेक विकास कामाचेभूमीपुजन व लोकार्पण सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनीप्रामुख्याने उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला व मतदारसंघात सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कायम कटिबद्ध राहू असे वचन दिले.


या विकास कामांमध्ये,
१. नाबार्ड - २ अंतर्गत अकोला जिल्ह्यातील मारोडी ते आपोती ग्रा. मा. १६९ वर साखळी क्रमांक ०/२०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे. किंमत ७२.५७ लक्ष रुपये, मौजे मारोडी येथे हनुमान मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे. किंमत १० लक्ष रुपये.
३. मौजे आपोती बु. येथे श्री.अभिमान शिरसाठ ते आसाराम पुर्नाजी तराळे यांचे घरापर्यंत सिमेंट नालीचे बांधकाम करणे. किंमत ७ लक्ष रुपये, आपोती खु. (आपातापा) येथे श्री. दिनकर भीमाशंकर ते श्रीकृष्ण मधुकर मानकर यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. किंमत १० लक्ष रुपये, आपोती खु. (आपातापा) येथे मेनरोड श्रीकृष्ण अपोतीकर ते कल्पना घुगरे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. किंमत १० लक्ष रुपये, खोबरखेड येथे मुख्य रस्ता ते गजानन महाराज मंदिरा पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. किंमत १२ लक्ष रुपये आदी विकासकामांचा समावेश आहे.


याप्रसंगी तालुका अध्यक्ष देवेंद्र देवर,शंकरराव वाकोडे अनिल गावंडे,पवन महल्ले,वैभव माहोरे,भरत काळमेघ,जगदीश घोडे, राजेश बेले, वैभव तराळे, श्रीकृष्ण झटाले,गणेश काळमेघ,भीमराव आठवले, सतीश टोबरे, शरद कराळे,राजेश बेले,अनिल गावंडे,तेजराव काटे,बंडु ढंगे,नारायण ठाकरे,सुभाष रायबोले, दिपक गडकले, उज्जल खोबरखेडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अकोला काँग्रेस राष्ट्रवादी सुळे गट उबाठासेना सेनेचे सहकारी डी एम के चे खासदार माजी मंत्री दयानिधी मारण यांनी हिंदी भाषिक व बिहार च्या नागरिकांविषयी अशबद वापरून त्यांचा अपमान करण्याचा प्रकारच्या भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आता यांचे तोंड बंद का? असा सवाल केला आहे हिंदी भाषिक व बिहारी नागरिकांचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला आहे संविधानामध्ये अशा प्रकारचा अपमान करणारा विषयी व त्यांच्यासोबत राहून हिंदी भाषिका विषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रकार म्हणजे भारताला अखंडला धोका निर्माण करण्याचा अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून सनातन धर्माचा अपमान सनातन धर्म विषयी वक्तव्य करणे त्यानंतर आता अशा प्रकारचा वक्तव्य करून मोल मजुरीसाठी व सेवाप्रधान करणाऱ्या यांच्या भरोशावर कारखाने उभे आहेत तामिळनाडूला तिथे असा प्रकार करून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न होत असताना नितीश कुमार पासून तर संजय राऊत राहुल गांधी गप्प का? हिंदी अस्मिता संदर्भात आवाज उठवणारे गल्लीतील नेते सुद्धा गप्प का असा सवाल करून असा प्रकार या देशांमध्ये सहन केल्या जाणार नाही व डी एम के चे दयानिधी मारण यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात आमदार सावरकर यांनीनिषेध व्यक्त केला आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या