Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांना 81 हजार रुपयाची मदत देण्याचा ऐतिहासिक निर्णय, आ. रणधीर सावरकर यांच्या मागणीची दखल 

शेतकऱ्यांना 81 हजार रुपयाची मदत देण्याचा ऐतिहासिक निर्णय, आ. रणधीर सावरकर यांच्या मागणीची दखल 


अकोला भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कापूस उत्पादक सोयाबीन शेतकऱ्यांना आमदार रणधीर सावरकर यांच्या मागणीची दखल घेऊन 81 हजार रुपयाची मदत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल तमाम शेतकऱ्यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी आभार व अभिनंदन व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांना संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कटिबद्ध असून राज्यातील भाजपा महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून वारंवार शेतकऱ्यांना संकटात मदत करण्यासाठी तत्पर राहते नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार रणधीर सावरकर यांनी चर्चेची सुरुवात महायुतीच्या वतीने करताना हे 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी केली होती चर्चेचे उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये मदत देण्याची घोषणा करून मर्यादा दोन हेक्टरीपेक्षा तीन हेक्टरी करून शेतकऱ्याला दिलासा देण्याचा काम केला आहे.

         सविस्तर वृत्त येथे 👆 पाहा... 

 तसेच 25% पीक विम्याची अगाव रक्कम देण्यात आली आहे तसेच राज्यातील 510 मंडळ सदृश्य दुष्काळ घोषित करून दुष्काळ च्या योजना सुरुवात करून शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना आधार देण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे हे शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार असून केवळ गप्पा न मारता शेतकऱ्या विषयी खोटी आपुलकी न दाखवता प्रत्यक्ष मदत करण्यासाठी व शेतकऱ्याला बळीराजाला मदत देण्याचे काम सरकार करत आहे.


 नमो पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सोबत राज्य शासनाने तीन हजार रुपये असे सहा हजार रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत आर्थिक बजेट सादर करताना जनतेला दिलेले अभिवचनाची पूर्ति पूर्तता प्रत्यक्षात दिल्याबद्दल तमाम शेतकऱ्यांच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व शेतकरी नेते शेतकरी चळवळीतून शेतकऱ्यांच्या भावना सभागृहात व्यक्त करणारे आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे. आमदार सावरकर अभ्यासू नेतृत्व व ग्रामस्थ जनतेच्या भावना व शेतकऱ्यांच्या भावना ओळखणारे लोकप्रतिनि म्हणून सभागृहात ओळखल्या जातात त्यांच्या अभ्यासू वृत्तीची दखल राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केला आहे त्याबद्दल सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी आमदार सावरकर यांची अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या