मराठा समाज आक्रमक तीन दिवसीय साखळी उपोषणानंतर एसडीओ कार्यालयावर मोर्चा धडकला
उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर, भविष्यात संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या निर्णयानुसार कार्य करण्याचा निर्धार
अकोला प्रतिनिधी: संतोष माने
मुर्तीजापुर:मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली (सराटी) येथे मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र, शासनाच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेऊन काही दिवसाचा अवधी मागितला. या वेळी मनोज जरांगे यांनी दोन महिन्यांचा वेळ शासनाला दिला आहे. मात्र, यादरम्यान साखळी उपोषण हे सुरूच राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात घडामोडींना वेग येत असून गावोगावी उपोषणाचे शस्त्र उगारले जात आहे. मुर्तीजापुर तालुका याही ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या समर्थनार्थ शनीवार ४ नोहेम्बर पासून आज ६ नोहेम्बर पर्यत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या प्रांगणात तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज बांधवांनी
गेल्या तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी साखळी उपोषण सुरू केले होते.
यामध्ये अनेक मराठा बांधव सहभागी झाले होते. तीन दिवसांत इतर समाजाचे अनेक गणमान्य व्यक्ती, संघटना, राजकीय पक्ष नेते, पदाधिकारी यांनी उपोषण स्थळाला भेटी देऊन आपली मराठा आरक्षणासाठी सहानुभूती व्यक्त केली. व आपला पाठिंबा जाहीर केला.या साखळी उपोषणाची आज तिसऱ्या दिवशी सांगता म्हणून ४:३० वाजता सकल मराठा समाजाने उपोषण स्थगित केले व भविष्यात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे कार्य करू असे यावेळी ठरले.व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले.शहराच्या मुख्य रस्त्यावरून घोषणाबाजी करत एसडीओ कार्यालय मूर्तिजापूर येथे एसडीओ संदिप कुमार अपार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी निवेदन सादर करण्यात आले.या मोर्चात तालुक्यातील सर्व समन्वयक व सकल मराठा समाजाचे बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या