संतांची शिकवण व आशीर्वादाशिवाय मानवी जीवन समृद्ध आणि सार्थ होत नाही– आमदार रणधीर सावरकर
अकोला सनातन धर्मापासून अविरतपणे वारकरी संप्रदाय मानवता तसेच बंधू प्रेम राष्ट्रभक्ती चे कार्य करत असल्यामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे मानवी जीवन प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकते असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
गत ६०-७० वर्षांच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये अकोट तालुक्यातील वरुड येथे वारकरी संप्रदायाचे संत वैकुंठवासी ह.भ.प. शिवराम पवार महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा व कार्तिकी सोहळा हजारो भाविकांच्या साक्षीने संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते द्स्न्य महात्म्यांचा सहवास व आशीर्वादासाठी आम्रदार रणधीर सावरकर दरवर्षी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित असतात. वरुड जऊळका हे गाव अकोला जिल्ह्यात वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख गाव आहे. या गावातील पवार घराण्यामधील वैकुंठवासी ह.भ.प. शिवराम पवार महाराज यांनी वारकरी संप्रदायाची पताका रोवून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली, जगत्गुरू तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज , संत वासुदेव महाराज संत नरसिंग महाराज, संत सावता माळी आदी संत श्रेष्टांचा वारकरी संप्रदायाचा व अध्यात्मिक विचारांचा प्रचार करण्यासाठी हभप शिवराम महाराज यांनी दूर दूर पर्यंत प्रबोधनासाठी हजारो शिष्यगण तयार केले. या सोहळ्याला वारकरी संप्रदायाच्या २०० दिंड्या हजारी लावतात.कार्तिकी यात्रे निमित्य जे भाविक भक्त पंढरपूर येथे जाऊ शकत नाहीत ते सर्व भक्तगण वरुड येथील श्री विठ्ठल रुख्मिणी संस्थान येथील या कार्तिकी सोहळ्याला हजर राहून पंढरपूरच्या विठू माउलीच्या आशीर्वादाची अनुभूती मिळाल्याचे समाधान प्राप्त करतात. कार्तिकी सोहळ्याच्या या कार्यक्रमाला अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित राहून या सोहळ्यातील संत महात्म्यांचा आशीर्वाद घेऊन भावी भक्तांसोबत अध्यात्मिक आणि आत्मिक विकासाची अनुभूती घेतली तसेच वारकरी म्हणून कार सेवा केली तसेच ताल मृदंगाचा मध्ये तल्लीन होऊन नामसकीर्तनाचा लाभ घेतला.
वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट म्हणजे या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक भाविक भक्त सहभागी होतात. या सोहळ्यामध्ये यात्रेच्या निमित्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळते. सध्याच्या विस्कळीत झालेल्या मानवी जीवनाला आपली मानसिकता सुदृढ करण्याचे मनोबल मिल्ण्यासोबत शारिरिक, मानसिक व भाविक नाते संबंध दृढ करण्यासाठी या वैद्यानिक युगात सुद्धा अशा अध्यात्मिक अधिष्ठाना व परंपरांचा उपयोग होतो असा विचार आमदार रणधीर सावरकर यांनी संत व भाविक भक्तांच्या मंदी आळी मध्ये व्यक्त केला. श्री विठ्ठल रुख्मिणी संस्थानाचे वतीने आमदार रणधीर सावरकर यांचा यथोचित सन्मान केल्याबद्दल आमदार रणधीर सावरकर यांनी आभार व्यक्त करून संत महात्म्यांचा आशीर्वाद घेतला,. या सोहळ्याला भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किशोर मांगटे पाटील डॉ. शंकर राव वाकोडे, राजूभाऊ नागमते, राजेश रावंकर, मधुभाऊ पाटकर, विवेक भरणे, संतोष शिवरकर, दत्तु पाटील गावंडे, सुभाष मुकुंदे, डॉ. मनोहर चाकोते, गजानन नळे , प्रेमानंद श्रीमाळी, चेतन डोईफोडे, काशिनाथ हिंगणकर, शिवकुमार शर्मा, हरिभाऊ आवारे, विठ्ठल वाकोडे, सोनू ओळंबे, बच्चू वानखडे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या