बेकायदेशीर उपभोग घेणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेली कारवाई योग्यच- सरपंच डॉ. कल्पना पळसपगार
मौजे हिंगर्णी बू. शिवरातील शेतरस्ते अतिक्रमण करून बेकायदेशीर उपभोग घेणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेली कारवाई योग्यच, सरपंच - गट ग्रामपंचायत हिंगणी बू. यांनी पत्रकार परिषदेत माहिती, विरोधक दवाबात घेऊन देत आहेत धमक्या
अकोला. जिल्हयातील गट ग्रामपंचायत हिंगणी बू. चे सरपंच डॉ. कल्पना अशोक पळसपगार यांनी १७ मार्च २०२३ रोजी ग्रामसभा घेऊन शेतं शिवारातील रस्त्यांवर अतिक्रमण करून शेतं रस्ते बंद करणारा शेतकरी हा जिल्हा परीषद सदस्य असून जिल्हा शिवसेना ऊ.बा.ठा. गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत. म्हणुन लोकप्रतिनिधी कायद्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार जिल्हाधिकारी अकोला यांचेकडे दिनांक २७जून २०२३ रोजी केली होती. त्या तक्रारीवर कारवाई होऊन त्यां शेतकरी व जी. प. सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. ही कारवाई योग्यच आहे .आणि उपमख्यमंत्री फडणवीस यांचा कोणताही हस्तक्षेप नसतांना त्यांचा अपमान करणे निंदनीय आहे.मात्र अपात्र ठरविण्यात आलेल्या सदस्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन उपुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून ती कारवाई आकसबुद्धीने केल्याचे पत्रकारांना सांगितले वास्तविक ही कार्यवाही कायदेशीर असुन न्याय देणाऱ्या अधिकारी महीला होत्या आणि न्याय मागणारी मी सुध्दा महीला असल्याने ही योग्य कारवाई झाली आहे. मात्र त्यांच्या कडून दिशाभुल केली जात असल्याचे आज सरपंच - गट ग्रामपंचायत हिंगणी बू. चे कल्पना अशोक पळसपगार यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.
त्यांनी याच पत्रकार परिषदेत सांगितले की, शिवसेना आमदार यांच्याकडुन धमक्या सुद्धा मिळत असुन त्यांनी पोलिसांना खोटी माहिती देऊन सरपंच यांच्या घरात अवैध शस्त्र सुद्धा आहेत, असे सांगीतले होते पोलिसांनी त्याची खातरजमा करून घेतली मात्र माहिती मध्ये तथ्य आढळले नसल्याने त्यांचे पित्त खवळले असून ते सरपंच यांचे जीवाचे बरेवाईट करू शकतात. अशी तक्रार सरपंच यांच्या आईने केलेली आहे .
आज आयोजीत पत्रकार परिषदेत सरपंच गट ग्रामपंचायत हिंगणी बू. यांनी पत्रकारांसोबत वार्तालाप करतांना सांगीतले की, मौजे हिंगणी बु. शेतशिवारात अनेक शेतरस्ते / पांदण रस्ते ,वहिवाटीचे रस्ते / सदन शेतकन्यांमार्फत अतिक्रमण करून बंद करण्यात आले आहेत. या संदर्भात गावातील नागरीकांच्या सतत तक्रारी असल्यामुळे गट ग्रामपंचायत हिंगणी बू. येथे ग्रामसभेत या विषयावर चर्चा करण्यात आली व समस्त गावकरी मंडळी यांच्या समक्ष सदरचे शेतरस्ते / पांदण रस्ते मोकळे करण्याकरीता ग्रामसभेत विशेष ठराव घेवून त्याचीअमलबजावरणी करण्याकरीता संबंधित विभाग व जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार प्रस्तावित करावी. त्याला अनुसरून तक्रर करण्यात आली.गट ग्राप्रपंचात हिंगणी बु . येथे गट क्र. १९४ गावाच्या लोकवस्ती पासुन सुरू होणारा शेत रस्ता / पांदण रस्ता जिल्हा परिषद सदस्य व गट नेता शिवसेना, जिल्हा प्रमुख शिवसेना अकोला जिल्हा यांच्या शेतापासुन गट क्र. १९३ मधून गट क्र.१७१ मध्ये जाणारा शेतरस्ता आशिष उर्फ गोपाल रामराव दातकर यांच्या मार्फत अतिक्रमण करून बंद करण्यात आला आहे. सदर रस्ता कुटासा रस्ताकडे जाणाऱ्या रेलरस्त्याला मिळतो व पुर्णपणे बंद असल्यामुळे गावातील नागरीकांना ये जा करण्याकरीता अडचण निर्माण झाली आहे. तसेच गट क्र. १९४ पासुन शेतरस्ता, पांदेण रस्ता सन २०११- १२ दरम्यान महात्मागांधी रोजगार हमी योजनेमार्फत तयार करण्यात आला होता परंतु आज रोजी अतिक्रमण केल्यामुळे त्याची रूंदी कमी झाली आहे. सदर रस्ता अंत्यत महत्वाचा असून हिंगणी बू. गावातील अत्पसंख्यांक समाज, मुस्लिम बांधवांचे कब्रस्तान गट क्र. १९२ मध्ये आहे व तेथे जाण्यासाठीचा मार्ग बंद करण्यात आल्यामुळे यापुूर्वी महा राजस्व अभियान अंतर्गत गावातील नागरीकांनी तक्रार तहसिल कार्यालयात केलेली आहे.तसेच गट क्र. २२२ मध्ये शेतमालक आशिष रामराव दातकर (गोपाल दातकर) यांचे शेत असून हिंगणी बू. शेत शिवारात रोहणा फाटा (रोहणाबस थांबा) पासुन ते जऊळखेड शिवारात जाणारा रस्ता हा गट क्र.२२२ या भागातुन जातो व गट क्र. २२२ मधील शेतमालक आशिष रामराव दातकर (गोपाल दातकर) यांनी सदरचा शेतरस्ता / पांदण रस्ता / सगर पुर्णपणे अतिक्रमण करून बंद केला आहे व येण्या जाण्यासाठी रस्ता बंद झालेला आहे. संबंधीत शेतमालक हे जिल्हा परिषद अकोला येथील सदस्य असुन गटनेता वअकोला जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रसुख आहेत. त्यामृळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास परिसरातील नागरीक धजावत नाहीत. त्यांच्या राजकीय प्रभावामुळे त्यांच्याबर योग्य कार्यवाही होत नसून अशा प्रकारे गट क्र.१९४ व गट क्र. २२२ मध्ये शेतरस्ता / पांदण रस्त्याचे अतिक्रमण करून त्यांच्या पदाचा दुरूपयोग करीत आहेत. तरी त्यांच्या विरोधात योग्य कार्यवाही करून सदर शेतरस्ते तातडीने मोकळे करण्यात यावे व शेतमालक आशिष रामराव दातकर यांच्या विरोधात कायदेशिर कार्यवाही करून बेकायदेशिर अतिक्रमण करून पदाचा दुरूपयोग केल्यामूळे त्याना पदावरून अपात्र होण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, या तक्रारी वरून त्यांच्यावर कारवाई झाली मात्र शिवसेना आमदार तथा जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी ही कारवाई चुकीची ठरवत या कारवाईला आव्हान देणार असल्याचे काल सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सांगीतले आहे मात्र ही कारवाई योग्यच असल्याचे आज गट ग्राम पंचायत हिंगणी बू चे सरपंच डॉ. कल्पना अशोक पळसपगार यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सांगीतले.
0 टिप्पण्या