सोयाबीन वर आला अज्ञात रोग, संभाजी ब्रिगेड चे योगेश ढोरे यांनी केली नुकसान भरपाईची मागणी
अकोला. पावसाळा ऋतूतील जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली त्यानंतर पंधरा ते वीस दिवस चांगला पाऊस झाला परंतु नंतर 40 ते 45 दिवस पावसात मोठ्या प्रमाणात खंड पडला ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेल्यामुळे कोरड्या दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांवर आले होते.
यामधून पिके कसेबसे तरली तर आता सोयाबीन वर एका अज्ञात रोगामुळे सोयाबीनच्या शेंगा भरण्यास अडचण निर्माण होत असून यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. पेरणीनंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पाहिजे ती मशागत केली योग्य वेळी रासायनिक फवारण्या सुद्धा झाल्या परंतु पावसाच्या खंडामुळे सोयाबीन वर विविध रोगांनी आक्रमण केले त्यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले बार्शीटाकळी तालुक्यातील राजनखेड,महागाव,चिंचोली रुद्रायणी, पाटखेड व जिल्हात इतर भागात या सोयाबीनवर हा रोग मोठ्या प्रमाणात आला असून या शेतकऱ्यांना शासनाने ताबडतोब नुकसान भरपाई देऊन 100% पीक विमा चा लाभ द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष योगेश ढोरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.निवेदन देत्यावेळी जिल्हा सोयाबीन वर आला अज्ञात रोग
संभाजी ब्रिगेड चे योगेश ढोरे यांनी केली नुकसान भरपाईची मागणी
अकोला. पावसाळा ऋतूतील जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली त्यानंतर पंधरा ते वीस दिवस चांगला पाऊस झाला परंतु नंतर 40 ते 45 दिवस पावसात मोठ्या प्रमाणात खंड पडला. ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेल्यामुळे कोरड्या दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांवर आले होते
यामधून पिके कसेबसे तरली तर आता सोयाबीन वर एका अज्ञात रोगामुळे सोयाबीनच्या शेंगा भरण्यास अडचण निर्माण होत असून यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. पेरणीनंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पाहिजे ती मशागत केली योग्य वेळी रासायनिक फवारण्या सुद्धा झाल्या परंतु पावसाच्या खंडामुळे सोयाबीन वर विविध रोगांनी आक्रमण केले त्यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले. बार्शीटाकळी तालुक्यातील राजनखेड,महागाव,चिंचोली रुद्रायणी, पाटखेड व जिल्हात इतर भागात या सोयाबीनवर हा रोग मोठ्या प्रमाणात आला असून या शेतकऱ्यांना शासनाने ताबडतोब नुकसान भरपाई देऊन 100% पीक विमा चा लाभ द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष योगेश ढोरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली. निवेदन देत्यावेळी शेतकरी पुत्र गोपाल पोहरे,जिल्हा उपाध्यक्ष देवानंद साबळे, शहर उपाध्यक्ष पंकज बाजोळ , शेतकरी अशोक फकीरा चव्हाण, लहू शांतराम चव्हाण,शिवा घनराम जाधव, सुनील विकास जाधव, महागाव ग्राम सदस्य अमोल ढोरे, परीक्षित ढोरे, राम ढोरे, संदीप उपरवट, गणेश अंदुले, मंगेश माकोडे,ओम वानखडे, इंजि अनुप सोळंके, विठ्ठल जानोरकार, गोपाल महाराज जोगदंड यांच्यासह अनेक शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या