Ticker

6/recent/ticker-posts

सापाचे ज्ञान मिळवणे म्हणजे सापाविषयी भीती नष्ट करणे- सर्पमित्र बाळ काळणे

सापाचे ज्ञान मिळवणे म्हणजे सापाविषयी भीती नष्ट करणे- सर्पमित्र बाळ काळणे


अकोला-  सोमवार 21 ऑगस्ट रोजी नाग पंचमी निमीत्त दिला संदेश. यावेळी त्यांनी चर्चा करताना सापांविषयी असलेले समज-गैरसमज याविषयी विस्तृत माहिती दिली.  "सापाचे ज्ञान घेतल्याने सापाची भीती नष्ट होते" या ब्रीदवाक्याखाली त्यांनी नागपंचमी उत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. नागपंचमीला नागरिक मोठ्या आस्थेने सापाला दूध पाजतात; पण दूध हे सापाचे अन्न नाही. साप पूर्णत: मांसाहारी असून, दूध प्यायल्याने सापांचा जीव धोक्यात सापडतो. साप हा निसर्गाचे संतुलन राखत असल्याने तो शेतकऱ्यांचा मित्रच समजला जातो; पण नागपंचमीच्या नावावर त्याला दूध पाजण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात दिसून येते ती चुकीचीअसल्याचे बाळ काळणे यांनी  सांगितले. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी मानव जातीप्रमाणेच सापांच्या प्रजातीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सापांच्या रक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे सण साजरे करा; मात्र सापांचे दैवतीकरण करून त्यांचा जीव धोक्यात टाकू नका, असे आवाहन यानिमित्ताने सर्पमित्र बाळ काढणे व सहकारी विकास पिंजरकर यांनी नागरिकांना केले.  


2018 मधे कर्करोगाच्या आजारातून बरे झाल्यानंतर वन्यजीव संरक्षणाचे कार्य मोठ्या जिद्दीने अन् खंबीरतेने सुरू ठेवले कर्करोगावर मात करीत सापांसोबतच इतर वन्य प्राणी व पक्ष्यांचे प्राण वाचविणारे ते राज्यातील एकमेव सर्पमित्र आहेत. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आतापर्यंत त्यांनी हजारो सापांना जीवनदान दिले आहे. सर्पमित्र बाळ उर्फ जयदीप काळाने यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड असे विविध सन्मान त्यांना मिळाले असून अकोला साठी अभिमानाची बाब आहे. नागपंचमी सना निमित्त विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या घरात निघालेल्या सापाला न घाबरता त्यावर लक्ष ठेवून तात्काळ सर्पमित्रांना बोलावून सापाला जीवनदान देण्याचे आवाहन केले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या