चतारी येथे हजारो वृक्ष लागवड केल्याचा बनाव उघड
सरपंचाची गटविकास अधिकाऱ्याकडे चौकशीची मागणी
नासीर शेख
पातूर: पातुर तालुक्यातील सस्ती चतारी व इतर ग्रामीण भागात हजारो वृक्ष लागवड केल्याचा बनाव करून मोजकेच वृक्षाची लागवड करून देयक लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे. याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी थेट अमरावतीच्या विभागीय आयुक्ताकडे केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने चतारी ग्राम पंचायत कडून वृक्ष लागवडीबाबत कुठल्याही प्रकारचा ठराव, दस्ताएवज, व प्रस्ताव देण्यात आला नसल्याचा खुलासा सरपंच नविता विनोद सदार यांनी १८ ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून सादर केला आहे. त्यामुळे ग्राम पंचायतच्या नावावर हजारो वृक्षाची लागवड कुणी केली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ग्राम पंचायतचा खोटा प्रस्ताव तयार करून हजारो वृक्षाची लागवड करण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे. या धक्कादायक प्रकाराची चौकशी करण्याची मागणी सरपंचाने केली आहे.
प्रतिक्रिया
वृक्ष लागवड करण्याच्या प्रस्तावावर मी सह्या दिलेल्या नाही, मग ग्राम पंचायतच्या नावावर हजारो वृक्षाची लागवड कुणी केली, याची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
नविता विनोद सदार सरपंच चतारी
हजारो वृक्ष लागवडीचा उडाला फज्जा
वृक्ष लागवडीच्या मोहिमेवर शासन संबंधितांना सक्तीचे आदेश पारित करीत आहे.मात्र पातुर तालुक्यातील ग्रामीण भागात हजारो वृक्ष लागवडीच्या मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या