Ticker

6/recent/ticker-posts

जनसंघ संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

जनसंघ संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम 


अकोला
राष्ट्रभक्त देशामध्ये शिक्षण प्रणाली संदर्भात अभ्यासू नेतृत्व, अर्थशास्त्री असणारे एक देश एक संविधान एक ध्वज यासाठी प्राणाची आहुती देणारे, देशासाठी केंद्रीय मंत्री चा राजीनामा देऊन हिंदुत्व व राष्ट्रीयत्वासाठी संघर्ष करणारे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करणे हे प्रत्येक राष्ट्रभक्तांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले. जनसंघ चे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भाजप कार्यालयात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल हे होते.
यावेळी नारायण पंचभाई नाना कुलकर्णी अण्णासाहेब उबाळे चंद्रशेखर पांडे गुरुजी बळीराम सिरस्कार विजय मालोकार सिद्धार्थ शर्मा एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर गिरीश जोशी तेजराव थोरात अनुप धोत्रे, माधव मानकर, मनोहर राहणे प्रकाश गुजराती डॉक्टर शंकरराव वाकोडे संजय जीरापुरे डॉक्टर विनोद बोर्डे संजय गोटफोडे, सजयगोडा , चंदा शर्मा, प्रवीण हगवणे, गणेश तायडे, नितीन लांडे, राजेश बेले, विवेक भरणे पंकज वाडीवाले तुषार भिरड पवन महल्ले,सागर शेगोकार , निलेश निनोरे जयंत मसने, एडवोकेट देवाशिष काकड , संतोष पांडे गणेश अंधारे अंबादास उमाळे अमोल साबळे रमण जैन, वसंत बाछुका, गीतांजली शेगोकार सुमनताई गावंडे वैशालीताई शेळके सारिका जयस्वाल रश्मी कायंदे चंदा ठाकूर शारदा ढोरे शारदा खेडकर , आधी प्रामुख्याने उपस्थित होते.


  डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी परमपूज्य द्वितीय सर संघ चालक गोवळ कर गुरुजी यांच्या मार्गदर्शनात केंद्रीय मंत्रिमंडळातून पंडित नेहरू यांच्या सरकारातून राजीनामा देऊन देश हितासाठी व आज अविभाज्य भारत असेल तर त्या डॉक्टर मुखर्जी यांचा संघर्ष महत्त्वपूर्ण आहे, एक आंदोलन करून सरकारने अनेक यातना दिल्यावर जेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यांचा बलिदान व्यर्थ न होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा यांनी पाच ऑगस्ट रोजी सर्वात आधी राज्यसभेत बहुमत नसताना सुद्धा जम्मू काश्मीर 370 कलम हटवण्यासाठी बिल आणून ऐतिहासिक कामगिरी केली व खरी श्रद्धांजली अभिवादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आली असेही आमदार सावरकर म्हणाले कार्यक्रमाचे संचालन विजय अग्रवाल यांनी तर प्रास्ताविक माधव मानकर तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ शर्मा यांनी केले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या