Ticker

6/recent/ticker-posts

पालकमंत्र्यांनी समस्यांना सामोरे न जाणे लोकशाहीला घातक- राजेश मिश्रा 

पालकमंत्र्यांनी समस्यांना सामोरे न जाणे लोकशाहीला घातक- राजेश मिश्रा 



अकोला -भाजपचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महानगरात आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना लोकशाही मार्गाने दिल्या जाणारे निवेदन देण्यापासून वंचित ठेवून लोकशाहीचा गळा घोटण्याचे पाप केले आहे. पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक असतो.त्याने जनतेचे कोणत्याही माध्यमातून निवेदने स्वीकारलेच पाहिजे. मात्र असे संवेधानिक संकेत पायदळी तुडवून फडणवीस यांनी जिल्ह्यातील प्रलंबित समस्यांना बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशा बाबींचा तीव्र निषेध करीत असल्याची माहिती शिवसेनेचे नेते राजेश मिश्रा यांनी दिली.


आज दिनांक 19 जून सोमवार रोजी यासंदर्भात शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद संपन्न झाली.यावेळी त्यांनी राज्यातील भाजप सरकार हे लोकशाही पायदळी तुडवीत असल्याचा आरोप केला.नुकत्याच झालेल्या दंगलीच्या संदर्भात पालकमंत्र्यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना भेट द्यावी, तसेच जिल्ह्यातील अन्य समस्यांना न्याय द्यावा,समस्यांचे निराकरण करावे यासाठी लोकशाही पद्धतीने शिवसेनेच्या वतीने त्यांना रीतसर निवेदन देण्याचे ठरविले होते. या संदर्भात शिवसेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी बायपास परिसरात एकत्र येऊन या ठिकाणी लोकशाही पद्धतीने निवेदन देण्याचे ठरविले. मात्र पोलीस प्रशासनाने पदाधिकाऱ्यांची चर्चा करून यासंदर्भात वरिष्ठांना निवेदन देण्याचे अवगत करूनही पालकमंत्री फडणवीस यांनी शिष्टमंडळाकडून निवेदन घेण्याचे नाकारले. उलट यात कहर म्हणजे सर्व पाच पदाधिकाऱ्यांना दाबकी रोड पोलीस ठाण्याच्या परिसरात स्थानबद्ध करून त्यांना उशिरा रात्री सोडण्यात आले. हा प्रकार लोकशाहीला घातक असून हे शासन धनदांडग्यांचे शासन असून गरिबांचा भाजप व्यवस्थेत कुणी वाली नसल्याचे मिश्रा यांनी स्पष्ट करीत हा प्रकार हुकुमशाही कडे वाटचाल असल्याचे सांगितले.यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने पालकमंत्र्यांच्या या कृतीचा तीव्र निषेध करण्यात आला. जुन्या शहरातील झालेल्या दंगलीमुळे या ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक भीतीमुळे इतरत्र पलायन करीत असल्याचे दिसून येत आहे. दंगलीत झळ पोहचलेल्या नागरिकांना शासनाने अद्यापही भरपाई दिली नाही. तसेच पारस येथे झालेल्या दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून या संदर्भातही पालकमंत्री यांना निवेदन देण्याचे ठरले होते. मात्र निवेदन स्वीकारता पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा गळा घोटला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्यांना राज्यातील जनतेच्या माध्यमातून जाब विचारणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या पत्रकार परिषदेत यावेळी शिवसेना नेते संतोष अनासाने, तरुण बगेरे, नितीन मिश्रा, योगेश गीते, अनिल परचुरे, नितीन ताकवाले,संजय अग्रवाल, रोशन राज, चेतन मारवाल, रमेश गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या