Ticker

6/recent/ticker-posts

विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी "विठ्ल - रुक्मिणी विमा छत्र" योजना सुरू, अभिनंदन आभार- आमदार सावरकर!

विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी "विठ्ल - रुक्मिणी विमा छत्र" योजना सुरू, अभिनंदन आभार- आमदार सावरकर!


अकोला
पंढरपूरच्या आषाढीवारीतील  वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी " विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना" लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री मा. एकनाथजी  शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. वारीदरम्यान  अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे.


• एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
• दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये.
• वारीच्या  आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल.

 सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, यांनी करून  आणि वारकऱ्यांच्या निरामय आरोग्याची विठ्ठल चरणी प्रार्थना केली व शासन सर्वसामान्यांचा गतिशील व सर्वांना न्याय देणारा असल्याचे सांगून केंद्र व राज्य सरकार डबल इंजन सरकार सर्वांच्या विकासासाठी सर्वांच्या चिंता व सर्वांचा भौगोलिक,  सामाजिक आर्थिक विकास व्हावा. व सर्व क्षेत्रातील गतिशील सरकार असल्याचा प्रत्यय वारंवार शिंदे फडणवीस सरकार देत असल्याचेही आमदार सावरकर म्हणाले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या