अवैध गोवंश तस्करी;गाव युवकांनी दिले बारा जनावरांना जीवदान
प्रतीनीधी- संतोष मानेगोवंश मासाची आणि गोवंशाची तस्करी करणारी वाहने जिल्ह्याच्या सीमेतून मोठ्या प्रमाणात जात आहेत या संदर्भात वारंवार करणाऱ्या कारवायावरून त्यांची पुष्टी होते. अशातच मुर्तीजापुर तालुक्यातील गोवंश तस्करांना पकडण्याची तिसरी घटना ग्राम सांगवा मेळ येथील युवकांनी बोलोरो गाडीचा पाठलाग करून आज 22 जून रोजी सकाळी 7:00 वाजताच्या दरम्यान पारद येथील पूर्णा नदीच्या तीरावर बारा गोवंशाची सुटका करून जीवदान दिले.
तालुक्यातील सांगवा मेळ हे गाव मुर्तीजापुर ते अकोला मार्गावर अगदी रोडवर असल्याने आज सकाळी बसस्थानकावर गावातील युवक बसलेले असता भटोरी येथील काही लोकांनी फोन द्वारे माहिती दिली. अन् बोलोरो गाडी गोवंश घेऊन जात असल्याची माहिती मिळताच, सांगवा मेळ येथील युवकांनी बोलोरो गाडीचा पाठलाग केला पारद येथील पूर्णा नदीच्या काठावरील काटेरी भागात बोलेरो गाडी पकडून १२ गोवंश यांना जीवदान दिले. वाहन चालक पळून जाण्यात यशस्वी झाला.
बारा गोवंश अक्षरशा: दाबून निर्दयीपणे आणल्याने जनावरांच्या तब्येती खालावल्या होत्या लगेच घटनास्थळी पशुधन विभागाची टीम ताबडतोब दाखल होऊन गोवंशावर उपचार करण्यात आले. यावेळी पशुधन अधिकारी डॉक्टर तुषार जयस्वाल,डॉक्टर आर आर काळे,डॉक्टर जऊळकर, पक्षुसेवक शुद्धोधन खांडेकर हे होते. घटनास्थळी मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस वेळेवर दाखल झाले त्यांनी सर्व सोपस्कार पार पाडले. पुढील तपास ठाणेदार पांडव यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या