लातूर येथील युवकाच्या हत्ये प्रकरणी अकोल्यात निदर्शने
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सम्राट अशोक सेने तर्फे निवेदन देण्यात आले, महाराष्ट्राला हादरून टाकणारे घटना लातूर जिल्ह्यात घडली. पैशाच्या शुल्लक कारणावरून सावकाराने मातंग बांधवाच्या डोळ्यात मिरची टाकून रॉडने मारत हत्याकांड घडवीले, महाराष्ट्रात दिवसान दिवस दलितांवर अत्याचार होत आहे, या सर्व घटनेचा सम्राट अशोक सेनेकडून जाहीर निषेध करण्यात आला.
लातूर रेणापूर येथील अतिशय संतापजनक घटना असुन मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे स्पर्श करा
गिरीरत्न तबकाले या मातंग गरीब बांधवाने गावातील सावकाराकडून तीन हजार रुपये 10% टक्याने व्याजाने घेतले.तीन हजारांच्या बदल्यात 20 हजार रुपये वसूल केले तरीही आणखी पैसे बाकीच आहे म्हणत भर बाजारात काठीने मारहाण केली. या मारहानीमधे युवकाचा मृत्यू झाला. नांदेड येथील घटना ताजी असताना लातूर जिल्ह्यात पुन्हा दलितांवर अत्याचार घटना वाढत असल्याचे चित्र राज्यभर बघावयास मिळत आहे. या हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच हा खटला फास्टट्रॅक कोर्ट मध्ये चालविण्याची मागणी सम्राट अशोक सेनेतर्फे करण्यात आली. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला.
0 टिप्पण्या