जीवघेणा हल्ल्यातील मृत्यू प्रकरणी तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
आलेगाव येथे दोन सख्ख्या भावावर जिवघेणा हल्ला प्रकरण
प्रतिनिधी नासीर शेख
पातूर : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत आलेगाव येथे चाकू हल्ल्यातील युवकाचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी तिघे आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगीचे आदेश पातुर न्यायालयाने दिले आहे. आलेगाव येथे शिवाजी चौकात दोन सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना २९ मार्च रोजी घडली होती. यातील गंभीर युवक चेतन काळदाते याचा ३ एप्रिल रोजी उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी चान्नी पोलीसांनी आरोपी महादेव धात्रक, गणेश धात्रक, दीपक धात्रक, यांच्याविरुद्ध जीवघेणा हल्ल्यासह हत्याचा गुन्हा दाखल करून अटक करून ६ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता, तिघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा १० एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायलयाने देले आहे.या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार योगेश वाघमारे करीत आहे.
चान्नी पोलिसांनी आरोपींना अवघ्या काही तसातच केली होती अटक
३ एप्रिल रोजी युवकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळताच तिघे आरोपी फरार झाले होते, परंतु ठाणेदार योगेश वाघमारे यांनी तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासातच तिघे आरोपींना जेरबंद केले
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या