Ticker

6/recent/ticker-posts

नेहरू पार्क चौकात काढला कँडल मार्च

नेहरू पार्क चौकात काढला कँडल मार्च


अकोला:
शहरातील मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, आणि जिल्हा पोलीस अधीक्षक हे जबाबदार अधिकारी आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शहरातील विस्कळीत व बेताल वाहतुकीचे रस्ता अपघातात अनेक बळी गेले आहेत. तरीही शहरातील नागरिक काही काळ शोक व्यक्त करून पुन्हा वाहतूक विस्कळीत करणारी भूमिकाच निभावत असतात तर जिल्हा पोलीस अधीक्षक तेवढ्यापुरते आपले सोपस्कार पूर्ण करतात आणि जिल्हाधिकारी यांना शहरात विस्कळीत वाहतुकीकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली तरीही नागरिकांच्या हक्कांसाठी कुणीतरी पुढे आले पाहिजे यासाठी सुमिरमा फाउंडेशन, अकोलाने शहरातील सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शहरात होणारे रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी उपाययोजना करा, अशी मागणी केली होती. मात्र, त्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने पुन्हा अपघात होऊ नये म्हणून नेहरू पार्क चौकात कँडल मार्च काढून नागरिकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला.


काल शनिवारी नेहरू पार्क चौकात कँडल मार्च काढण्यात आला. सुमिरमा फाउंडेशनने नेहरू पार्क चौक रोडवर होणाऱ्या अपघातांना आळा घालता यावा यासाठी अकोला महानगरपालिका, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलेक्टर ऑफिस या सर्वांना १४ मार्च रोजी जाहीर निवेदन देण्यात आले होते. परंतु याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नसल्याने सुमिरमा फाउंडेशनच्या वतीने कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये शहरातील रस्त्यावरील सिग्नल्स सुरू करा, ट्रॅफिक पोलिसांची नियमितपणे चौकाचौकात ड्युटी असावी, झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा, रस्त्यांवर वाहनधारकांना स्पष्ट दिसतील अशा ठिकाणी रेडियम लावलेले असावेत, मोठ्या जड वाहनांना शहरात रात्री ११ पर्यंत बंदी घालण्यात यावी, चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, चौकांच्या मध्यभागी एक पॉइंट तयार करून चौफेर मार्गाची दिशा मोकळी करावी. असे अनेक मुद्दे घेऊन ही कँडल रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर नागरिकांनी काय काळजी घ्यावी, कुठल्या नियमांचे पालन केले पाहिजे जेणेकरून अपघातापासून बचाव होऊ शकेल याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. यामध्ये सुमिरमा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.


यामध्ये सुमिरमा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पूजा सुमित्रा रमाकांत खेतान, विशेष उपस्थिती रमाकांत खेतान, अशिष खिल्लारे, शिवानी राजूरकर, गीता मोर्य, मालोकार, विशाल धांडे, संजय ठोके, आनंद गवई, धर्मेंद्र शिरसाट, देवेंद्र तिवारी, अश्विन पांडे, पंकज वाधवे, पंकज साबळे तसेच फाउंडेशनचे इतर सदस्य सुद्धा उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या