Ticker

6/recent/ticker-posts

आठ दिवस स्थगिती उठविण्याची वाट पाहू , अन्यथा खाऱ्या पाण्याचा टँकर दिल्लीला नेऊ - आमदार देशमुख

आठ दिवस स्थगिती उठविण्याची वाट पाहू , अन्यथा खाऱ्या पाण्याचा टँकर दिल्लीला नेऊ - आमदार देशमुख


 आठ दिवस देवेंद्र फडवणीसांकडून स्थगिती उठविण्याची वाट पाहू अन्यथा खाऱ्यापाण्याचा टँकर दिल्लीला नेऊ, अशी माहिती आमदार नितीन देशमुख यांनी जलसंघर्ष यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमा दरम्यान शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 


बाळापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी नागपूर येथे पोहोचताच, नागपूरच्या वेशीवरच डिटेन करून अकोल्यात आणले असता त्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केलीय. आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांनी पिण्याच्या पाण्याला स्थगिती दिलीय त्यामुळे 69 खेड्यातील ग्रामीण नागरिक खारेपाणी पीत आहेत, त्यांना विविध आजाराने ग्रासले असून त्यांच्या किडण्या खराब झाल्याची माहिती यावेळी देशमुख यांनी दिली.


 हर घर जल, हर घर नल हा पंतप्रधानांचा नारा असून अकोल्यात मात्र आपलेच राजकारणी त्याला हरताळ फासत असल्याचं ते म्हणालेय. या संघर्ष यात्रेत वयोवृद्ध शेतकरी सहभागी झाले होते.या शेतकऱ्यांना डिटेन केलं तेव्हा पोलिसांनी आम्हाला पाणी पाजले आणि आम्ही ते प्यायले परंतु आम्ही पालकमंत्र्यांच्या दारी जाऊन टँकरने भरलेले पाणी त्यांनी का नाकारले या प्रश्नाचे उत्तर त्यांनी जिल्ह्याचे एक पालक मंत्री म्हणून द्यायलाच हवे असे ही ते यावेळी म्हणाले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या