जल यात्रेसाठी नागपूर पोलिसांचा नकार
काय आहे आ. नितीन देशमुख यांची भूमिका...
अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या जल यात्रेला नागपूर पोलिसांनी परवानगी नाकारलीय..
यात्रे संदर्भात ठाकरे गटाच्यावतीने ५ एप्रिलला नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना यात्रे संदर्भात माहिती आणि परवानगी मिळवण्याकरिता अर्ज केला होता मात्र विविध करणे देऊन ही यात्रा रोखण्यात आलीय..
बाळापूर विधानसभा मतदार संघामधील ६९ खेडी योजनेवरील स्थगिती उठवण्यात यावी यासाठी नितीन देशमुख यांनी आपल्या समर्थकांसोबत अकोला ते नागपूर पायदळ यात्रा काढलीय ..खारपान पट्ट्यातील खऱ्या पाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंघोळ घालण्यासाठी ही यात्रा काढण्यात आलीय...ही यात्रा २० एप्रिलला नागपूर येथे पोहचणार आहे मात्र त्याआधीच नागपूर पोलिसांनी शहरात ३७ (१) (३) म.पो का अन्वये मनाई आदेश लागू असून आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमास परवानगी घेणे बंधनकारक आहे,परंतु आपले कार्यक्रमाबाबत परवानगी करिता अर्ज प्राप्त नाही..तसेच उपमुख्यमंत्रीचे निवासस्थान हे खाजगी निवासस्थान असून त्या ठिकाणी कोणतेही आंदोलन/मोर्चा/लोकांनी एकत्रितरित्या जमा होणे इत्यादी परवानगी देण्यात येत नाही म्हणून सदर ठिकाणी आपणास आंदोलन/मोर्चा/लोकांनी एकत्रितरित्या जमा होणे इत्यादी स्पष्टपणे नाकारण्यात येत आहे असा पत्र नितीन देशमुखांना देण्यात आलाय....नितीन देशमुख आता काय पवित्रा घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेय...
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या