Ticker

6/recent/ticker-posts

अकोला ते अकोट या मार्गावर गांधीग्राम गावाजवळ पुलाच्या दोन्ही बाजूनी अकोला ते गांधीग्राम तसेच गांधीग्राम ते अकोट अशी ST बस सेवा तातडीने सुरु करा.....माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे

अकोला ते अकोट या मार्गावर गांधीग्राम गावाजवळ पुलाच्या दोन्ही बाजूनी अकोला ते गांधीग्राम तसेच गांधीग्राम ते अकोट अशी ST बस सेवा तातडीने सुरु करा.....माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे 


अकोला

अकोला अकोट मार्गावरील गांधीग्राम जवळील पूर्णा नदीवरील पूल धोकादायक झाल्याने या मार्गावरील वाहतूक 
जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश क्रमांक कक्ष -२/गृह/प्रस/प्रक्र/कावि-४९२/२०२२ दिनांक १८/१०/२०२२
 आदेशानुसार पर्यायी मार्गाने वाहतूक जरी वळविण्यात आलेली असली तरी पर्यायी मार्ग हे अरुंद, लांब अंतराचे, इंधन आणि वेळ खर्ची घालणारे आहेत. तसेच सदर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग स्वरूपाचा असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. या रस्त्याच्या लगतच्या ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात वाहतूक तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी आरोग्य, बाजारपेठ, शिक्षण या मुख्य कारणांसाठी होत असल्याने नागरिकांना पर्यायी वळण रस्त्याचा कोणताही फायदा नाही त्यामुळे अकोला ते अकोट या मार्गावर गांधीग्राम गावाजवळ पुलाच्या दोन्ही बाजूनी अकोला ते गांधीग्राम तसेच गांधीग्राम ते अकोट अशी ST बस सेवा तातडीने सुरु करा अशी मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना पत्राद्वारे केलेली आहे.


 पत्राद्वारे मुख्यतः लक्ष वेधण्यात आले की सद्यस्थितीत दिवाळीसणाचा मोठा उत्सव सुरु झाल्याने नागरिकांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच खरीप हंगामाचे उत्पादन बाजार पेठेमध्ये शेतकऱ्यांकडून आणण्यात येते त्यामुळे ग्रामीण आर्थिक व्यवस्था बाधित होऊ नये तसेच या दिवाळसण उत्सवाचे काळात किरकोळ व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय असतो या सगळ्या बाबी लक्षात घेणे क्रमप्राप्त आहे, या शिवाय अकोट – अकोला मार्गावरील पर्यायी पुलाचे काम रखडलेले असल्याने ते काम पूर्ण करण्यास किमान वर्षभराचा कालावधी लागणार असल्याने इतकी दीर्घकाळ वाहतूक खंडित राहणार आहे. दीर्घकाळ खंडित असणारी वाहतूक नागरिकांना गैरसोयीची तसेच मनस्ताप व खर्चिक स्वरुपाची असल्याने प्रवासी नागरिक इतका दीर्घकाळ वेठीस राहू नये या करिता एक पर्यायी उपाय म्हणून गांधीग्राम येथील क्षतिग्रस्त झालेल्या पुलावरून नागरिक या बाजूकडून त्या बाजूकडे पायी चालत जाऊ शकतात किंवा कसे या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अभिप्राय घेऊन पुलाच्या दोन्ही बाजूंकडून एस.टी. बस सेवा सुरु ठेवणे सहज शक्य आहे काय याची शहानिशा करण्यात यावी. या करिता अकोला ते अकोट या मार्गावर गांधीग्राम गावाजवळ पूर्णा नदीवरील पुलाच्या अली कडील बाजुकडून अकोला ते गांधीग्राम तसेच पली कडील बाजूकडून गांधीग्राम ते अकोट (पूर्णा नदीवरील पुलाच्या पलीकडून) अशी बस सेवा. अत्यंत तातडीने सुरु करणे बाबत जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर तातडीने कार्यवाही करावी जेणेकरून या मार्गावरील नागरिकांना प्रवास करणे शक्य होईल असे खासदार संजय धोत्रे यांनी आपल्या पत्रात स्पष्ट करून तातडीने बस सेवा सुरु करण्याची मागणी केलेली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या