मूर्तिजापूरातून शासकीय तंत्रनिकेतनचे दोन विद्यार्थी बेपत्ता
मूर्तिजापूर : येथील हेंडज शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिकणारे दोन विद्यार्थी लागोपाठ दोन दिवसात बेपत्ता झाल्याची खळबळ जनक माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हेंडज येथे शासकीय महाविद्यालयात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षण घेण्यासाठी येतात, आई वडीलांपासून कोसो दूर असलेले विद्यार्थी शहरातील विविध भागात भाड्याने खोली करुन अथवा वसतीगृहात राहतात, आपले पाल्य शिक्षणासाठी बाहेर असल्याने पालकांच्या जीवाची घालमेल होत असते. अशात शिक्षणासाठी आलेली मुले गायब झाल्याने पालकांची चिंता वाढविणारा गंभीर विषय ठरला आहे. अमरावती जिल्ह्य़ातील खल्लार येथील विद्यार्थ्यांनी अर्पिता प्रकाश खंडारे (१७) शासकीय तंत्रनिकेतन मध्ये शिक्षण घेत होती त्यासाठी ती प्रतिक नगर येथे नातेवाईकाकडे राहायला असल्याची माहिती आहे. ती २ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता पासून बेपत्ता झाली आहे. त्याच बरोबर हरीश जगन्नाथ खंडेराव रा. वरवट (खंडेराव) ता. संग्रामपूर जिल्हा बुलढाणा हा शासकीय तंत्रनिकेतन येथील वसतीगृहात राहत होता तो ३ अॉक्टोबर रोजी तंत्रनिकेतन कुलमंत्री, अधिक्षकांची रितसर अर्ज देऊन परवानगी घेऊन गावी जात असल्याचे सांगून निघून गेला परंतु त्याच्या पालकांच्या मते तो अद्यापही घरी पोहोचला नाही. बेपत्ता झालेल्या या विद्यार्थ्यांची नातेवाईक व इतरत्र शोधाशोध केली मिळून आले नाही या संदर्भात शहर व ग्रामीण पोलिसात हरविल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. वरील फोटोतली विद्यार्थी आढळून आल्यास मूर्तिजापूर ग्रामीण व शहर पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या