Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांसाठी बारा तास वीज व आर्थिक नवी योजना

शेतकऱ्यांसाठी बारा तास वीज व आर्थिक नवी योजना


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अकोला पालकमंत्री आज अकोला दोरावर आले असता अनेक प्रलंबित कामांचा त्यांनी आढावा घेतला यावेळी सर्वात प्रथम त्यांनी शेतकऱ्यांना कापसाला योग्य हमीभाव मिळवून देण्याचे नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन दिले परंतु बाजारभावामध्ये हमीभाव कमी झाल्यास तरीही शेतकऱ्यांजवळून संपूर्ण माल घेऊन त्यांना योग्य हमीभाव मिळून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी शेतकऱ्यांसाठी त्यांनी 12 तास वीज देण्याचे सुद्धा त्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी वीज फार महत्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामांमध्ये कोणताही अडथळा न निर्माण होण्यासाठी 12 तास वीज देण्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 


त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेऊन शेतकऱ्यांना त्याचा योग्य असा मोबदला दिल्या जाईल की ज्यामध्ये शेतातील उत्पादनापेक्षा शेतकऱ्याचा फायदाच होईल, अशी योजना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतातून उत्पादन होत नसेल किंवा अतिवृष्टीमुळे शेतकरी प्रत्येक वर्षी हातबल होत असेल व आर्थिक संकटात सापडत असेल, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा नक्कीच फायदा होईल, असेही ते यावेळी म्हणाले. ज्या शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर शेती द्यायची असेल त्यांना योग्य आर्थिक मोबदला देऊन त्यांच्या शेतीवर शासनामार्फत पीक उत्पादन घेतल्या जाईल. जेणेकरून शेतीचे मालक हे शेतकरीच राहतील व त्यांना आर्थिक उत्पन्न सुद्धा कुठलेही नुकसान न होता मिळेल. त्यामुळे निश्चितच शेतकरी सुखी व आनंदी जीवन जगेल असे त्यांनी यावेळी जाहीर केले.


*सत्तेचा विस्तार नसल्यामुळे अनेक जिल्ह्याचे पालकत्व...*

नुकतेच भाजपा शिंदे गटाची सत्ता राज्यात स्थापित झाली असून आज त्याला शंभर दिवस पूर्ण होत आहेत. या अल्पकाळात भाजपा शिंदे सत्तेने जास्तीत जास्त आणि चांगल्या प्रकारची कामे करण्याचा प्रयत्न केला आहे. मागील दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये भरपूर अशी कामे मागे पडलेली असताना, ती पूर्ण करण्यासाठी निश्चितच भाजपा - शिंदे सत्ता पुढे सरसावणार आहे, परंतु सध्या परिस्थितीत सत्तेचा विस्तार न झाल्यामुळे आणि कामाची विभागणी व वाटणी न झाल्यामुळे सध्या अनेक जिल्ह्यांचे पालकत्व आपल्याकडे आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे साहजिकच जिल्ह्यातील कामकाज ढेपाळलेली आहेत. लवकरच खातेवाटप होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली व आपल्या सत्तेच्या काळापासून थांबलेली सर्व कामे पूर्ववत सुरू करून चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


*संपूर्ण राज्यभर सुरू असलेले रस्त्याची कामे लवकरच पुर्ण*

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर असतांना त्यांनी संपूर्ण राज्यभर रस्ता बांधणीचे काम सुरू असल्याबाबतचा आढावा घेतला. यावेळी बऱ्याच कालावधीपासून रस्त्याची कामे राज्यभर सुरू आहेत. यावेळी अकोला शहरातही रस्त्याची कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु ही रस्त्याची कामे बऱ्याच कालावधीपासून अपूर्ण आहेत, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. ती कामे का लांबणीवर जात आहेत? याचा आढावा घेऊन संबंधितांवर कारवाई करून ती लवकरच पूर्ण करण्याचेही यावेळी सांगितले. याप्रसंगी त्यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांविषयीही चर्चा केली. ग्रामीण भागामध्ये आजही बऱ्याच गावासाठी रस्ता उपलब्ध नाही, तर बऱ्याच गावातील रस्ते अपूर्ण आहेत. ती लवकरच पूर्ण करून, ज्या ठिकाणी रस्त्याचे आयोजन झाले नाही तिथे लवकरच रस्ता निर्माण करण्याचे नवीन आयोजन करण्याचे त्यांनी जाहीर केले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या