गांधीजींच्या नेतृत्वात स्वातंत्र्याचा संग्राम, तर मोदींच्या नेतृत्वात सुराज्याचा संकल्प ! -आमदार सावरकर
अकोला : "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचावा हे उद्दिष्ट साध्य झाले ; स्वातंत्र्याचे उद्दीष्टच गुलामगिरीतून सुटका आणि शेवटच्या घटकाचे कल्याण हे होते. स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्याचे यशस्वी नेतृत्व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केले तर गरीबासाठी कल्याणकारी योजना राबवून सुराज्याचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरसावरकर यांनी आज केले.
अकोला जिल्ह्यात येथे आयोजित राष्ट्रानेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा समारोप , नदी महोत्सव शुभारंभ , हॅलो ऐवजी वंदे मातरम् शुभारंभ अश्या भव्य कार्यक्रमात ते बोलत होते.
२०१४ ते २०१९ या काळात फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास झाला गेल्या अडीच वर्षात विदर्भाचा विकास थांबला होता आता त्याला गती मिळणार ही आपल्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे . अकोला जिल्ह्याच्या भूमीतून स्वातंत्र्याचा आवाज बुलंद झाला. ‘चले जाव’ आणि ‘भारत छोडो’चा मंत्र देण्यात आला, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. वाडेगाव पारस जिल्ह्यात क्रांती झाली. युनियन फ्लॅग खाली आला आणि तिरंगा वर चढला आणि त्यानंतर देश स्वतंत्र झाला, असेही आमदार सावरकर म्हणाले.
आज जिल्ह्यात वंदे मातरम् अभियानाचा , विविध केंद्र सरकार व राज्य सरकारच्या लाभार्थ्यांची संपर्क व कार्यकर्त्यांच्या अभिनंदन कार्यक्रमात ते बोलत होते . आमदार सावरकर यांनी भारत माता की जय, शिवाजी महाराज की जय, गांधीजी की जय, लालबहादुर शास्त्री की जय आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देऊन भाषणाची सुरुवात केली. व्यासपीठावर आजच्या शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार गोवर्धन शर्मा , आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल , रवी गावंडे जयंत मसने , राजेश बेले शंकरराव वाकोडे, माधव मानकर, किशोर पाटील सचिन देशमुख कुसुम भगत मोनिकाताई गावंडे, चंदा शर्मा,, जयश्री कुंडकर अनुप धोत्रे, , रमेश आप्पा खोबरे संजय जीरापुरे संजय गोटफोडे, मनीराम ताले रामदास तायडे प्रकाश गुजराती मनोहर राहणे, तेजराव थोरात अंबादास उमाळे अनिल गावंडे, बाळासाहेब आपोती कर बळीराम सिरस्कार हिरासिंग राठोड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित होते. विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा व कार्यरत समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला.
स्वातंत्र्याचा संग्राम गांधीजींच्या नेतृत्वात सुरू झाला आणि सुराज्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वात सुरू झाला. त्यासाठी हा सेवा पंधरवडा आहे. दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांच्या व्यासपीठावर ही सुरुवात झाली. राज्याने ही सुरुवात केली. जो जो वांछिल तो ते लाहो, या भावनेने मोदी काम करत आहेत. आई आपल्या मुलाचे कधीही नुकसान होऊ देत नाही, त्याचप्रमाणे मोदीसुद्धा देशाच्या एकाही नागरिकाचे नुकसान होणार नाही, यासाठी काम करत आहेत. विकास कामांचा उद्घाटन २०२० मध्ये करायचे होते. पण दोन वर्ष उशीर झाला. , जबाबदारी सामूहिक भाजपा लोकप्रतिनिधी वर आहे खांद्यावर आता आहे, असे आ. सावरकर यांनी सांगितले यांनी सांगितले.
पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील. आता ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आता "डी"फॉर "देवेंद्रच" नाही तर "डी" फॉर "डेव्हलपमेंट", असे असेल. यापूर्वी आमच्या सरकारच्या काळात नाट्यगृहाचा काम 80 टक्के झाला आहे नंतर अडीच वर्ष आपले सरकार नव्हते. फडणवीस देतात. त्यामुळे नाट्यगृह लवकरच होईल, असा विश्वास भाजपा सरचिटणीस आमदार सावरकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या