Ticker

6/recent/ticker-posts

अकोल्यात 51 फूट रावणाचा रिमोट दारे केला धुव्वा

अकोल्यात 51 फूट रावणाचा रिमोट दारे केला धुव्वा


अकोला- विजयादशमी म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय, या दिवशी रामाने रावणाचा वध करून सत्यावर विजय मिळवला होता, असे म्हणतात. विजयालक्ष्मी हा दिवस भारत देशात रावणाच्या पुतळ्याचे दहन करून साजरा केला जातो. यावेळी अकोला शहरात 51 फूट रावणाचे दहन करण्यात आले. यात विशेष बाब म्हणजे अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात पहिल्यांदाच रिमोट कंट्रोलद्वारे रावणाचे दहन करण्यात आले. 


आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे दहन करून समाजातील अनिष्ट व वाईट प्रथा नष्ट होण्यासाठी या रावणाचे दहन करण्यात आले. या रावण दहन कार्यक्रमात तापडिया नगरच्या युवा शक्ती नव दुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच रामदासपेठ पोलिसांनीही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या