Ticker

6/recent/ticker-posts

अष्टभुजा नवदुर्गा उत्सव मंडळ गरबा रास चे आयोजन आणि बक्षीस वितरण

अष्टभुजा नवदुर्गा उत्सव मंडळ गरबा रास चे आयोजन आणि बक्षीस वितरण


अकोला
आनंद, भक्ती ,श्रद्धा ,संस्कार परंपरा ,तसेच शक्तीची प्रतीक मा दुर्गा ची भक्ती महिन्याचे महत्व सनातन धर्मामध्ये असल्यामुळे नवरात्राच्या पर्वावर अष्टभुजा नवदुर्गा मंडळाने कला संस्कृती मानवतेचे कार्य करून सुप्त गुणांना प्रोत्साहन देऊन तू शक्तीचा सन्मान करून दिशादर्शक कार्य केल्याचे प्रतिपादन कमल सखी मंचाच्या नेत्या सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांनी केले.


अष्टभुजा नवदुर्गा उत्सव मंडळ मराठा नगर येथे फक्त महिला आणि मुलीकरिता गरबा रास चे आयोजन आणि बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी मंचावर सौ मंजुषा ताई सावरकर ,सौ अर्चना ताई मसने ,सौ.सुनीता ताई अग्रवाल ,सौ चंदा ताई शर्मा अर्चनाताई शर्मा, सौ.सुमनताई गावंडे, सौ.सीमा ताई मागटे पाटील ,सौ.सारिका जयस्वाल या मान्यवरांच्या उपस्थितीत 9दिवस गरबा खेळणाऱ्या बक्षीस वितरण करण्यात आले.
अष्टभुजा नवदुर्गा मंडळ सातत्याने नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजन करून समाजाला संस्कृती तसेच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजन करून सामाजिक दायित्वा सोबत परिवार राष्ट्र आपल्या परिसराचा विकास एकतेचा संदेश सोबत अध्यात्म धार्मिक संवर्धनाचे कार्य करीत असल्याचे प्रतिपादन यावेळी सौभाग्यवती मंजुषाताई सावरकर यांनी केले यावेळी अर्चनाताई शर्मा यांनी मा दुर्गा वर काव्य प्रस्तुत करून सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. अर्चनाताई मसने चंदाताई शर्मा सारिका ताई देशमुख सुमनताई गावंडे यांची समायोजित भाषणे झाली यावेळी महाआरती तसेच विशेष पूजा अर्चना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार सेवा करणाऱ्या मातृ शक्ती चे सुद्धा सन्मान करण्यात आले.


सौ. तृप्ती भाटिया ,अकोला जिल्हा महेश्वरी समाज महिला ,साई कृपा प्रो. तसेच मंडळाच्या वतीने यांच्या तर्फे सुद्धा प्रोसहान पर बक्षीस वितरण करण्यात आले. मंडळात महिलांची सुरक्षा लक्ष्यात घेता केवल महिला आणि मुलीनंसाठीच गरबा रासचे पूर्ण सुरक्षे सहित मंडळातील सर्व सदस्याच्या वतीने गरबा रास आयोजित करण्यात आला होता. सौ .सुहासिनी ताई धोत्रे यांनी सर्व मुली आणि महिलांचे कौतुक केले. लहान मुलींना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. या वर्षीची गरबा क्वीन सौ. प्राची सराफ यांना हा मान देण्यात आला . कार्यक्रमाचे संचालन सौ. अलका जैन यांनी केले.तर जर्ज सौ मोक्ष्या शहा यांनी केले. 9दिवस गरबा रास आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.या साठी मंडळाचे अध्यक्ष श्री राहुल देशमुख,श्री शिवा कराले,श्री सुरेश जस्वानी,सुनील चव्हाण ,सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. आभार प्रदर्शन सौ निकिता राहुल देशमुख यांनी केले. क्रमांक सहा प्रभात तीन च्या मातृशक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाले .


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या