शिक्षकांचा अपमान, म्हणजेच देशाचा अपमान
शिक्षक हा देशाच्या विकासाला हातभार लावणारा, त्यांची बरोबरी देशाच्या नेत्यानं प्रतीची, बरोबरीचे स्थान असल्यामुळे त्यांच्याच बरोबरीचा पगार आणि निवृत्ती वेतनही शिक्षकांना देण्यात यावे.
राज्य कायम विनानुदानित शाळा कृती समितीच्या कोल्हापूर महिला आघाडी प्रमुख नेहा भुसारी मॅडम यांच्या स्वामी समर्थ विद्यालय कणेरीवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील शाळेत स्वतः शिक्षण मंत्री यांनी भेट देऊन जवळपास 20 मिनिटांपेक्षा अधिक वेळ दिला. शिक्षण मंत्री महोदय यांनी सकाळी स्वामी समर्थ विद्यालय कणेरीवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या शाळेत दुपारी बाराच्या सुमारास भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी विद्यार्थ्यासोबत संवाद साधला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या वह्या स्वतः बघितल्या. त्यांना होमवर्क बद्दल प्रश्न विचारले, त्यांची गुणवत्ता कशी आहे ते तपासले, काही आकृत्या बोर्डवर काढायला लावल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर सर्व शिक्षकांना सोबत बैठक पार पडली. यावेळी विनाअनुदानित शैक्षकांचा वीस वर्षांच्या वेदनादायक व संघर्षमय प्रवास शिक्षकांनी सांगितला. जवळपास 180 पेक्षा जास्त आंदोलन करून देखील काहींना अंशतः तर काहींना काहीच अनुदान मिळाले नाही. हे खूप दुर्दैवी आहे असे सांगितले गेले. समान काम समान दाम, या नैसर्गिक न्यायाने आता सर्वांना प्रचलित सूत्र लागू करा ही एकमेव मागणी मान्य करण्याची विनंती करण्यात आली. यावर मंत्री महोदयांनी प्रचलित नुसार खूप मोठा आकडा होतोय हे शक्य नाही, सरकारकडे पैसे नाहीत तुम्ही एक काहीतरी पगाराची रक्कम सांगा त्यानंतर आम्ही कधीही वाढ करणार नाही. तसेच तुम्हाला पगार संघटना देते की सरकार अशी खोचक विचारणा केली.
असे विधान करून शिक्षणमंत्री शिक्षकांचा अपमान करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. आज शिक्षकांच्या हाताखालून शिकलेले विद्यार्थी लाखाच्या घरात पगार घेत आहेत, वेठबिगारी सारख्या मजुराला मोजकाच पगार देऊन बोळवण करण्याचा प्रकार सध्या राज्य सरकारने ठाकलेला दिसत आहे. हे सरकार झटपट निर्णय घेत आहे, त्याप्रमाणे शिक्षकांचा हक्क त्यांना मिळून द्यावा अशी अपेक्षा आहे. मंत्री महोदयांनी हे सरकार टिकवायचे आहेत, त्यासाठी ते वस्तुनिष्ठ विचार करतात म्हणुन त्यांनी एक समाधानकारक रक्कम सांगा, त्या नंतर कोणतीही पगार वाढ होणार नाही, असे खोचक विधान करून त्यांना काय साध्य करायचे आहे कळत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता स्वतः तपासुनही, गुणवत्तेच्या बाबतीत शिक्षक कुठेही कमी पडत नसताना दिसत नाही, मग हा अन्याय का? असा प्रश्न आज शिक्षकांना पडला आहे. बऱ्याच शिक्षकांनी विनानुदानित प्रकरणामुळे कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. अनेक जण बिनपगारी रिटायर होत आहेत. एकंदरीतच मंत्री महोदयाच्या विधानावरून असे लक्षात येते की आपल्याला प्रचलित धोरणानुसार अनुदान मिळणारे द्वार कायमस्वरूपी बंद करून आपल्याला बेदखल करण्याचा सरकारचा डाव आहे. या सरकारला व या शिक्षण मंत्र्याला विनानुदानित शिक्षकांची ताकद दाखवून देण्यासाठी एक मोठ्या आंदोलन होणे अत्यंत आवश्यक आहे, असे दिसत आहे. भाजपा - शिवसेना (शिंदे गट) प्रणित महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री यांनी शिक्षकांना योग्य असा पगाराचा आकडा सांगून त्यांना आयुष्यभर शिक्षण दानाचे काम केल्यानंतर एक विशिष्ट असा पगाराचा आकडा सांगण्यास आणि त्यानंतर पुन्हा कधीही पगार वाढ होणार नाही असे खोचक विधान करून, शिक्षक व शिक्षण क्षेत्राचा शिक्षण मंत्री असून अपमान केला आहे. शिक्षक हा देशाचा मुख्य गाभा असून तो एक पिढी घडविणारा व देशाच्या विकासाला हातभार लावणारा देशभक्त आहे. ज्ञानदाना बरोबरच शिक्षक शिक्षणाव्यतिरिक्त देश विकासाचे, निवडणुकीचे, जनगणनेचे व इतरही कामे करीतच असतो. अशा शिक्षकांचा अशा प्रकारचे विधान सुचवून शिक्षकाचा अपमान करून देशाचाच अपमान केला आहे.
खरंच अशा प्रकारचे कटकारस्थान शिक्षण क्षेत्रात राबविण्याचे आयोजिले गेले असेलच तर शिक्षकांच्या पगाराचा योग्य आकडा हा देशाचे काम पाहणारे, देश कारभार चालविणारे, नेते व मंत्री बरोबरीचे स्थान असणारा शिक्षक आहे. त्यांची बरोबरीचे स्थान असल्यामुळे त्यांच्याच बरोबरीचा पगार आणि निवृत्ती वेतनही शिक्षकांना देण्यात यावे. जेणेकरून शिक्षकांचा अपमान होणार नाही व सन्मानाने तो या देशात वावरेल. असा सन्मान जर शिक्षकाला दिल्या गेला तर शिक्षक यानंतर कधीही पगार वाढ अथवा शाळेला अनुदान मागणार नाही. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी जे विधान सुचविले आहे, त्याचे योग्य ती शिक्षकांच्या मान सन्मानाची बाजू घेऊन, या मताचे अंमलबजावणी आपल्याच सत्तेत करून दाखवावी व संपूर्ण देशातील शिक्षकांना योग्य तो मान मिळवून द्यावा अशी विनंती संपूर्ण विनाअनुदानित शिक्षकांकडून होत आहे. असे झाल्यास हा विनानुदानित शिक्षक या सत्तेचे ऋण कधीही फेडू शकणार नाही.
लेखक-
प्रा. प्रज्ञानंद थोरात
मो- 9822674487
अकोला
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या