यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना व भूमिहीन शेतमजुरांना तसेच जनावरांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी व मोलमजुरी करणारे तसेच जनावरे अतिवृष्टीमुळे संकटात असून या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्यात बुडाली आहेत. मुंग, उडीद, सोयाबीन, कपाशी इत्यादी पिके उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच जनावरांच्या लम्पी नावाच्या आजाराने थैमान घातले आहे. तालुक्यातील अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. तसेच शासनाने तात्काळ मदत दिली नाही तर भीक मांगो आंदोलन करून तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. यावर शासनाने लवकरात लवकर अंमलबजावणी करून शेतकरी, शेतमजूर तथा मुक्या जनावरांना योग्य तो न्याय मिळून द्यावा अशी विनंती यावेळी निवेदनातून करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्याचे वतीने आज संग्रामपूर तहसील कार्यालय अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून दिले आहे. निवेदनातून अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच लंम्पी आजारावरील योग्य ते उपाय योजना करून मुक्या जनावरांना लस मोफत उपलब्ध करून देण्याचे सुद्धा मागणी केली. यासोबतच पिक विमाधारक शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा मंजूर करून घेण्यात यावा. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पासून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. दुबार व त्रिवार पेरणी करून शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शेतकरी कार्डधारकांना शासनाने गव्हाचे वाटप बंद केलेले आहे, ते पुन्हा सुरू करण्याचे मागणी केली आहे.
त्या बरोबरच शासनाने तात्काळ सात दिवसाच्या आत सदर जाहीर निवेदनाच्या विनंतीवरून मागण्या मान्य नकेलूयास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुकास्तरावर भिक मांगो आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनातून करण्यात आला. यावेळी अध्यक्ष विजय हागे, रत्नाकर भिलंगे, आत्माराम वसुलकार, संजय इंगळे व आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या